धक्कादायक! टी20 वर्ल्ड कप तिकीट काळाबाजारप्रकरणी माजी क्रिकेटपटूसह ६ जणांना अटक

मुंबई : तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. यावर्षी भारत आणि श्रीलंका येथे टी20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारत आणि इंग्लंड असा सामना रंगला होता. ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी एका प्रशिक्षकासह एका माजी क्रिकेटपटूला अटक केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी २६ वर्षीय बलवंत सिंह सोधा याला अटक केली असून तो यापूर्वी मुंबई अंडर-१९ संघाकडून खेळला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, या नेटवर्कमध्ये बलवंत सिंहची महत्त्वाची भूमिका होती आणि तिकिटांची व्यवस्था तोच करत होता. त्यानंतर तो आपल्या साथीदारांना ही तिकिटे जास्त दराने विकण्यासाठी पुरवत होता.


रिपोर्टनुसार, उपांत्य सामन्याची तिकिटे २५ ते ३५ हजार रुपयांना विकली गेली. आतापर्यंत या प्रकरणात एकूण ६ जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये एका महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकासह एका नॉन-टीचिंग स्टाफ सदस्याचाही समावेश आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संबंधित व्यक्तींना किंवा पाहुण्यांना दिले जाणारे पास आरोपींनी मिळवून त्यांची विक्री सुरू केली असावी. काही तिकिटे थेट लोकांना तर काही ऑनलाइन माध्यमातून विकण्यात आली.

Comments
Add Comment

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो