विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; नवी मुंबई विमानतळावरून जोडली जाणार ही ३० शहरे

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हवाई प्रवासाचा विस्तार होणार आहे. नियोजनानुसार रविवार २९ मार्चपासून या विमानतळाचे नवे वेळापत्रक लागू होत आहे. या वेळापत्रकानुसार २९ मार्च २०२६ पासून दररोज ७६ विमानसेवा उपलब्ध होणार आहेत. नवी मुंबई विमानतळ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या वेळापत्रकानुसार प्रवाशांना आता देशातील अनेक शहरांसाठी थेट सेवा उपलब्ध होणार आहे. सध्या मर्यादित शहरांपर्यंतच उपलब्ध असलेली सेवा आता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे.

नव्या नियोजनानुसार देशांतर्गत एकूण ४६ शहरांपर्यंत उड्डाणे उपलब्ध होणार आहेत. यामध्ये काही प्रमुख मार्गांवर दररोज अनेक फेऱ्या असतील. विशेषतः दिल्ली, गोवा आणि बेंगळुरू या शहरांसाठी उड्डाणांची संख्या लक्षणीय राहणार आहे.

याशिवाय हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, वाराणसी आणि इंदूर यांसारख्या शहरांसाठी नियमित सेवा उपलब्ध राहणार आहे. तसेच आग्रा, औरंगाबाद, अयोध्या, बागडोगरा, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ, चंदीगड, देहराडून, दिऊ, दुर्वापुर, गोवा, गोरखपूर, हिंडन, राजकोट, हुबळी जबलपूर, जम्मू, झारसुगुडा, कन्नूर कोल्हापूर, मदुराई, पटना, रायपूर, श्रीनगर, तिरुपती, तिरुवनंतपूरम तसेच विशाखापट्टणम यांसारख्या विविध शहरांनाही या विमानतळाद्वारे जोडले जाणार आहे.

विमानसेवांची संख्या वाढत असल्यामुळे नवी मुंबई विमानतळावरील प्रवासी वर्दळही वाढणार आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी नवी मुंबई विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे नियोजन वेगाने सुरू आहे. विमानतळावर एक पॅसेंजर इंटरजेंज तयार करण्याचे नियोजन आहे. या इंटरजेंजद्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ चार मेट्रो मार्गिकांशी जोडला जाईल.

मुंबई शहर ते नवी मुंबई अशी धावणार असलेली मेट्रो ८ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस दोनपासून ही मार्गिका सुरु होईल आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडली जाईल. मेट्रो आठ वरील स्थानकावर मेट्रो ७ आणि मेट्रो ३ ला जोडणी मिळेल. मेट्रो आठवरून प्रवाशांना मेट्रो ४, मेट्रो २ आणि नवी मुंबई मेट्रो लाईन १ साठी इंटरचेंज मिळणार आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला चार मेट्रो मार्गिकांळशी जोडणी मिळाल्यामुळे प्रवासी मेट्रोद्वारे कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, मानखुर्द येथील आंतरराज्य बस टर्मिनसपर्यंत पोहोचू शकतील. सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणतेही रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानक नाही. त्यामुळे प्रवाशांना रिक्षा, टॅक्सी, कॅब हे खर्चिक पर्याय वापरूनच विमानताळवर पोहोचता येते अथवा विमानतळावरून पुढे घराच्या अथवा हॉटेलच्या दिशेने प्रवास करावा लागतो. यात वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. कनेक्टिव्हिटी मिळाल्यावर प्रवाशांच्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.
Comments
Add Comment

विस्तारित मेट्रो लाईन ५- ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प

Nitesh Rane Water Metro : पहिली 'वॉटर मेट्रो' मुंबईत दाखल !

मंत्री नितेश राणे यांनी दिली खुशखबर; 'कॅन्डेला पी-१२' बोटीच्या चाचण्यांना जूनमध्ये सुरुवात मुंबई : मुंबईकरांचा

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना