‘शक्ती’ कायद्यातील 'त्या' दोन महत्त्वाच्या तरतुदींचा आता BNS मध्ये समावेश; मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडले सुधारणा विधेयक!

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत 'भारतीय न्याय संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक २०२६' मांडले. या विधेयकाद्वारे पूर्वीच्या बहुचर्चित 'शक्ती कायद्या'तील दोन अत्यंत महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश आता नवीन भारतीय न्याय संहितेत (BNS) प्रस्ताव राज्य सरकारने मांडला आहे.


विधेयक मांडताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेने अत्यंत संवेदनशीलतेने 'शक्ती कायदा' एकमताने मंजूर केला होता. हा कायदा मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला असता, केंद्राने कळवले होते की नवीन 'भारतीय न्याय संहिता' (BNS) आणली जात आहे. त्यामुळे दोन स्वतंत्र कायद्यांमध्ये तांत्रिक संघर्ष निर्माण होऊ नये, अशी सूचना केंद्राने केली होती.


केंद्राने BNS कायदा मंजूर केल्यानंतर, त्यामध्ये शक्ती कायद्यातील बहुतांश तरतुदींचा अंतर्भाव आधीच करण्यात आला आहे. मात्र, राहिलेल्या तरतुदींचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, शक्ती कायद्यातील दोन महत्त्वाच्या तरतुदी BNS मध्ये समाविष्ट नसल्याचे समोर आले, ज्या आता राज्य दुरुस्तीद्वारे लागू केल्या जाणार आहेत.


विधेयकातील दोन प्रमुख सुधारणा


१. अ‍ॅसिड हल्ला पीडितेची ओळख गुप्त ठेवणार : सध्याच्या कायद्यानुसार बलात्कार किंवा तत्सम गंभीर गुन्ह्यांतील पीडितेचे नाव जाहीर करण्यास बंदी आहे. मात्र, शक्ती कायद्यात ही व्याप्ती वाढवून 'अ‍ॅसिड हल्ला' पीडित महिलांचे नावही गुप्त ठेवण्याची तरतूद होती. हीच तरतूद आता BNS मध्ये राज्य दुरुस्तीद्वारे समाविष्ट केली जात आहे. यामुळे पीडितेच्या खासगीपणाचा (Privacy) आदर राखला जाईल.


२. डिजिटल माध्यमांवरील बदनामी आता 'लैंगिक शोषण': दुसऱ्या महत्त्वपूर्ण दुरुस्तीनुसार, जर कोणत्याही डिजिटल माध्यमावर (Social Media/Internet) स्त्रीची बदनामी केली, तर ती केवळ मानहानी न ठरता, 'लैंगिक शोषण' (Sexual Offence) किंवा बलात्काराच्या विविध श्रेणींर्तगत गुन्हा मानली जाईल. डिजिटल युगात महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे अत्यंत मोठे पाऊल मानले जात आहे.


या दुरुस्त्या छोट्या असल्या तरी महिला सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी ठरणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सभागृहाने या सुधारणांना पाठिंबा दिल्यास महाराष्ट्रात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांत अधिक कडक कारवाई करणे सुलभ होईल.

Comments
Add Comment

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडीचा चेहरामोहरा बदलणार; गृहनिर्माण प्रकल्पांना मिळणार वेग

मुंबई: दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील हजारो रहिवाशांचे पुनर्वसनाचे

एसअँडपीने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ७.१ टक्क्यांपर्यंत वाढवला

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवरही भारताची आर्थिक वाढ मजबूत राहील. एस अँड पी

सिंगापूर न्यायालयाने झुबीन गर्ग यांचा मृत्यू अपघाती ठरवला; कोणताही घातपात नसल्याचा निष्कर्ष

नवी दिल्ली : सिंगापूर कोरोनर कोर्टाने प्रसिद्ध आसामी गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी आपला अंतिम निकाल

डिजिटल माध्यमांवरील महिलांची बदनामी आता 'लैंगिक गुन्हा'

- 'भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक २०२६' विधानसभेत सादर; 'शक्ती' कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींचा

दोन खाजगी कौशल्य विद्यापीठांना मान्यता, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ६० टक्के जागा राखीव; कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा

खाजगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची गरज ओळखून नव्या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणी कांदा प्रश्न बाबत विधानभवनात