मेट्रो-११ मार्गिकेच्या कामाला वेग, 'जायका'कडून ५ हजार ५०० कोटींचे कर्ज

मुंबई : वडाळ्यातील आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया या भुयारी मेट्रो ११ मार्गिकेतील आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत. या मार्गिकेसाठी सुमारे २३ हजार ४८७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम कर्ज आणि दुय्यम कर्जातून उभारली जाणार आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेने (जायका) ५ हजार ५०० रुपयांचे कर्ज दिले आहे. जपानी अधिकृत विकास सहाय्य (ओडीए) कर्जरुपाने हे कर्ज देण्यात आले. यामुळे प्रकल्पाच्या कामाला येणार वेग येणार आहे.


केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे संयुक्त सचिव आलोक तिवारी आणि जेआयसीए इंडिया कार्यालयाचे मुख्य प्रतिनिधी टेकुची ताकुरो यांनी नवी दिल्लीत या कर्जाच्या करारावर नुकतीच स्वाक्षरी केली. जायकाकडून ५ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज मिळाल्याने मेट्रो-११ मार्गिकेतील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. वडाळा - ठाणे - कासारवडवली मेट्रो-४ मार्गिकेचा विस्तार वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान मेट्रो-११ मार्गिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यानुसार आणिक आगार, वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया अशी १७.५१ किमीची ही भुयारी मार्गिका असणार असून यात १४ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. १४ मेट्रो स्थानकांपैकी एक स्थानक उन्नत असणार असून उर्वरित १३ स्थानके भुयारी असणार आहेत. या मार्गिकेस राज्य सरकारने मान्यता दिली असून आता या प्रकल्पाच्या प्रस्तावास केंद्र सरकारच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे.

Comments
Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना