कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना मोठा दिलासा; हेक्टरी २२ हजार रुपयांपर्यंत मदत देण्याचा राज्य सरकारचा मानस

मुंबई: गेल्या काही दिवसांत झालेल्या अवेळी पाऊस आणि हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अत्यंत सकारात्मक पाऊल उचलले असून, फळ पीक विमा न उतरवलेल्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्री यांनी आज विधानसभेत यासंदर्भात सविस्तर माहिती देत पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे जाहीर केले.





नुकसानीचा प्राथमिक अहवाल आणि बैठक


आंबा व काजू पिकाच्या सद्यस्थितीबाबत १७ मार्च रोजी पहिली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सादर करण्यात आलेल्या प्राथमिक अहवालानुसार, प्रतिकूल हवामानामुळे यंदा फळधारणा अत्यंत कमी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील सुमारे ८० हजार शेतकऱ्यांनी आंबा पिकासाठी विमा उतरवला आहे. कोकणातील ३०२ महसूल मंडळांपैकी १५५ मंडळांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक असल्याचे समोर आले आहे.


विमा संरक्षण आणि नुकसान भरपाईचे स्वरूप


अवेळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी १५ मे पर्यंत विमा संरक्षण लागू आहे. हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत आंबा उत्पादकांसाठी प्रति हेक्टर २ लाख २७ हजार रुपये नुकसान भरपाईची तरतूद आहे. तर काजू उत्पादकांसाठी प्रति हेक्टर १ लाख ६० हजार रुपये नुकसान भरपाई मिळू शकते. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला नाही, त्यांनाही वाऱ्यावर न सोडता शासन स्तरावर आर्थिक मदत दिली जाणार आहे. गेल्या वेळी अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५ हजार रुपये देण्यात आले होते. मात्र, नुकसानीचे स्वरूप पाहता यंदा ही मदत वाढवून २२ हजार रुपये प्रति हेक्टर देण्याचा सरकारचा मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Ashok Kharat: व्हायरल व्हिडीओने खळबळ, अशोक खरात एचआयव्ही पॉझिटिव्ह?

मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे

मेट्रो-११ मार्गिकेच्या कामाला वेग, 'जायका'कडून ५ हजार ५०० कोटींचे कर्ज

मुंबई : वडाळ्यातील आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया या भुयारी मेट्रो ११ मार्गिकेतील आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत.

पीएनजी असलेल्या भागात एलपीजी पुरवठा होणार बंद

नवी दिल्ली : देशातील ऊर्जा साखळीत मोठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले