देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमध्ये देशभरात १०० नवीन विमानतळ उभारण्यास मंजुरी, उडान २.० योजनेचा विस्तार, तसेच परदेशी नागरिकांच्या व्हिसा आणि ट्रॅकिंग प्रणालीची योजना २०३१ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


प्रत्येक विमानतळासाठी सरासरी सुमारे १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, या प्रकल्पासाठी सरकारने १२ हजार १५९ कोटी रुपयांचा बजेट निश्चित केला आहे. हे विमानतळ चॅलेंज मोडमध्ये उभारले जाणार आहेत. म्हणजेच, ज्या राज्य किंवा शहराकडून जमीन सुरक्षा व्यवस्था, आवश्यक सुविधा लवकर आणि चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातील, त्या ठिकाणांना विमानतळासाठी प्राधान्य दिले जाईल. देशातील लहान शहरांना हवाई सेवेशी जोडण्यासाठी सुरू असलेली उडान योजना आता पुढील १० वर्षांसाठी (२०३६ पर्यंत) वाढवण्यात आली आहे. या योजनेसाठी सरकार २८ हजार ८४० कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांसाठी हवाई प्रवास अधिक स्वस्त आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.


सरकार देशभरात २०० नवीन आधुनिक हेलीपॅड उभारणार आहे. विशेषतः डोंगराळ भाग, ईशान्य भारत आणि बेट क्षेत्र येथे रस्ते बांधणे कठीण आहे, तिथे हेलिकॉप्टर हा मुख्य वाहतूक पर्याय बनवण्याचा सरकारचा उद्देश आहे. या प्रकल्पासाठी ३ हजार ६६१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय भारतात तयार होणाऱ्या विमानांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन विमान खरेदीसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे.


२०३१ पर्यंत व्हिसा आणि इमिग्रेशन ट्रॅकिंग योजना


भारतामध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या व्हिसा, नोंदणी आणि ट्रॅकिंगशी संबंधित आयव्हीएआरटी योजना पुढील ५ वर्षांसाठी, म्हणजे १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेसाठी १ हजार ८०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, भारताची इमिग्रेशन आणि व्हिसा प्रणाली अधिक आधुनिक आणि सुरक्षित बनवणे हा यामागील उद्देश आहे.

Comments
Add Comment

Chief Minister of Keral : अखेर सस्पेन्स संपला ! केरळमचे मुख्यमंत्री ठरले

Chief Minister of Keral : केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने (Congress ) व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची

Delhi Bus Rape Case : दिल्ली हादरली! स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चेत आली आहे. राजधानीत एका खासगी

Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदी ते दूधाच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांत देशाच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात झपाट्याने घडामोडी घडताना दिसत आहेत.

Maharashtra ATS Launches Massive Crackdown : ATS चा धडाका! पाकिस्तानस्थित 'भट्टी गँग'चे जाळे उखडून फेकले; महाराष्ट्रात ४० ठिकाणी छापे, ५७ जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बुधवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण राज्यात एक मोठी शोधमोहीम राबवली.

Uttar Pradesh Storm : उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून ५६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध जिल्ह्यांना बुधवारी भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. या

Monsoon Rain Update : उकाड्यापासून लवकरच सुटका! अंदमानात पुढच्या ४८ तासांत पावसाच्या सरी कोसळणार!

देशभरात उन्हाचा चटका वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) एक दिलासादायक बातमी दिली आहे. नैऋत्य