केज नगरपंचायत निधी गैरव्यवहार प्रकरण : राज्य सरकारची मोठी कारवाई; दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

मुंबई : बीड जिल्ह्यातील केज नगरपंचायतीमध्ये 'प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)' अंतर्गत निधीच्या वितरणात झालेल्या अनियमिततेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी अंतरिम चौकशी अहवाल राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज सभागृहाच्या पटलावर ठेवला असून, दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. दरम्यान, आमदार योगेश सागर यांनी या अधिकाऱ्यांच्या कारभाराबद्धल आक्षेप घेतला.



पारदर्शकतेसाठी राज्य सरकारकडून चौकशी समितीची स्थापना


पंतप्रधान आवास योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. केज नगरपंचायतीमध्ये निधी वितरणात काही तांत्रिक त्रुटी आणि आर्थिक अनियमितता असल्याची तक्रार प्राप्त होताच, सरकारने अंबाजोगाईच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष चौकशी समिती नेमली होती. या समितीने सादर केलेला अंतरिम अहवाल राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेच्या पटलावर ठेवला.



४.२४ कोटींच्या निधी वितरणाची सखोल चौकशी


या प्रकरणाच्या चौकशी अहवालातील तपशिलानुसार, ९ मार्च २०२६ पर्यंत उपलब्ध झालेल्या अधिकृत कागदपत्रांच्या आधारे केज नगरपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी मूळ आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याऐवजी, इतर संस्था, कंत्राटदार आणि काही अनधिकृत व्यक्तींच्या बँक खात्यांवर सुमारे ४ कोटी २४ लाख ७३ हजार २३ रुपये वर्ग करण्यात आले आहेत. ही गंभीर बाब समोर आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या गैरव्यवहारामध्ये तत्कालीन केजचे मुख्याधिकारी मिलिंद सावंत, श्रीमती नीता अंधारे आणि लेखापाल असर खतीब यांच्या कार्यकाळातील संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी सरकार आता पुढील पावले उचलत आहे.


राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले की, "काही कागदपत्रांची पडताळणी अद्याप सुरू असून, १५ व्यक्तींचे बँक स्टेटमेंट मिळणे बाकी आहे. पुढील १० दिवसांत अंतिम अहवाल सादर केला जाईल."


या प्रकरणावर विधानसभेत चर्चा झाली असता, प्रशासकीय यंत्रणेतील पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणातील गांभीर्य ओळखून पुढील निर्देश दिले: या प्रकरणात स्पष्टपणे अनियमितता दिसून येत आहे. त्यामुळे पुढील १० दिवसांत संपूर्ण चौकशी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे."

Comments
Add Comment

राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र 'नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण' स्थापन होणार; मंत्री पंकजा मुंडे यांची विधानसभेत माहिती

मुंबई : राज्यातील नद्यांमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार आता एक मोठे पाऊल

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडीचा चेहरामोहरा बदलणार; गृहनिर्माण प्रकल्पांना मिळणार वेग

मुंबई: दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील हजारो रहिवाशांचे पुनर्वसनाचे

एसअँडपीने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ७.१ टक्क्यांपर्यंत वाढवला

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवरही भारताची आर्थिक वाढ मजबूत राहील. एस अँड पी

डिजिटल माध्यमांवरील महिलांची बदनामी आता 'लैंगिक गुन्हा'

- 'भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक २०२६' विधानसभेत सादर; 'शक्ती' कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींचा

दोन खाजगी कौशल्य विद्यापीठांना मान्यता, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ६० टक्के जागा राखीव; कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा

खाजगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची गरज ओळखून नव्या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणी कांदा प्रश्न बाबत विधानभवनात