उद्धव ठाकरेंना भोंदूबाबा प्रकरणात सहआरोपी करायचे का ?

मुंबई : भोंदूबाबाचे कारनामे २००३ पासून सुरू होते, मात्र काँग्रेस सरकार आणि महाविकास आघाडी सरकारने त्याला बेड्या ठोकण्याची हिंमत दाखवली नाही. या भोंदूबाबाला पायघड्या घालण्याचे काम, भोंदूबाबाच्या आश्रमाला पाणी पुरवण्याचे काम उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ सरकारने केले. महायुती सरकारमधील नऊ मंत्र्यांना त्यांचे भोंदूबाबासोबत फोटो आहेत म्हणून त्याला आक्षेप घेत सहआरोपी करा अशी मागणी संजय राऊत करत आहेत. मग या न्यायाने उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी करायचे का असा खरमरीत सवाल भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. न्याय सर्वांना एकच असायला हवा असेही ते म्हणाले.


भोंदूबाबाला बेड्या ठोकण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे चार दिवसांपूर्वी अभिनंदन करणारे राऊत आज मात्र या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकारण करत आहेत अशी टीका करतात हा विनोदच आहे. भोंदूबाबा मुद्द्यावरून राऊत राजकारण करत आहेत. खोटेनाटे आरोप करणे, भोंदूबाबाला पायघड्या घालणे याला हीन राजकारण करणे म्हणतात असे हीन राजकारण करण्यात राऊतांचा हात कोणी धरणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या कारकीर्दीत भोंदूबाबाच्या काळ्या कृत्याला जे कोणी साथ देत असतील त्या सर्वांवर चौकशीअंती कठोर कारवाई होणार असे बन म्हणाले.


विरोधी पक्षातील आणि उबाठा गटातील खासदार हे निधीमुळे नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या वर्तनामुळे नाराज आहेत. उद्धव ठाकरे त्यांना भेटत नाहीत, घराबाहेर पडत नाहीत, मतदारसंघाचा दौरा करत नाहीत की महाराष्ट्राचा दौरा करत नाहीत, याबद्दल त्यांची नाराजी आहे. तसेच आदित्य ठाकरेही आमदार-खासदारांना भेटत नाहीत.यामुळेच ४० आमदार साथ सोडून गेले तरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊतांना शहाणपण सुचत नाही असा टोमणाही बन यांनी लगावला.


राऊत विरुद्ध उबाठा असा संघर्ष सुरू


संजय राऊत यांच्या पुस्तकाच्या हिंदी-इंग्रजी आवृत्तीच्या दिल्लीत होणा-या प्रकाशन समारंभाचे निमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला जाणे टाळले. उबाठा गटात राऊत विरुद्ध ठाकरे असा संघर्ष वाढत असल्यामुळेच उद्धव यांनी दिल्लीतील पुस्तक प्रकाशन समारंभाला जाण्याचे टाळले अशी टीका बन यांनी केली. हा संघर्ष पुढे आणखी तीव्र होण्याची शक्यता ही त्यांनी वर्तवली.


उद्धव ठाकरे कर्तृत्वशून्य मुख्यमंत्री आणि आमदार


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेने सहा वर्षांपूर्वी विधान परिषदेचे आमदार झालेले आणि भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे हे कर्तृत्वशून्य मुख्यमंत्री आणि आमदार होते. आमदारकीच्या आणि मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत उद्धव यांनी महाराष्ट्राच्या हिताचे एकही काम केले नाही, महाराष्ट्राच्या हिताचा एक ही प्रश्न विधान परिषदेत विचारला नाही अशी टीका बन यांनी केली. अडीच दिवस मंत्रालयामध्ये येणारे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी उद्धव यांची अवहेलना केली होती याचेही स्मरण बन यांनी करून दिले.

Comments
Add Comment

Dhule : प्रसूतीसाठी गेली पण परत जिवंत आलीच नाही ! पिंपळनेरमध्ये महिलेच्या मृत्यूने संतापाचा स्फोट ; काय घडलं ?

Dhule : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरमध्ये (Pimpalner) एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Lionel Messi's world record : इंग्लंड विरुद्ध दोन असिस्ट करून इतिहास रचला आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला.

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लिओनेल मेस्सीने दिलेल्या दोन असिस्ट्सचे गोलांमध्ये रूपांतर

Eknath Shinde : 'कच्छी समाजाशी नातं हे कुटुंबासारखंच'; ठाण्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : कच्छी अस्मिता मंचतर्फे आयोजित 'कच्छी पगडी कोणशिरे' या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी

FIFA World Cup 2026 : अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी प्रदर्शित केलेल्या बॅनरमुळे वादाची ठिणगी

अटलांटा: फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत इंग्लंडवर २-१ ने विजय मिळवल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी

Mumbai Water Stock : मुंबईला दिलासा! तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस; जलसाठा ४८.६६% वर, दोन तलाव ओव्हरफ्लो

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत

Shri Jagannath Rath Yatra 2026 : आजपासून श्रीजगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ! २४ जुलैपर्यंत रंगणार भक्तिमय सोहळा; जाणून घ्या महत्त्व, परंपरा आणि संपूर्ण वेळापत्रक

पुरी (ओडिशा): सनातन धर्मातील सर्वात पवित्र आणि भव्य उत्सवांपैकी एक असलेल्या श्रीजगन्नाथ रथयात्रेला आज (१६ जुलै)