'क्राइम पेट्रोल'मध्ये पोलिसाची भूमिका; पण खऱ्या आयुष्यात २५ लाखांचा गंडा! अभिनेत्यावर नक्की काय ओढावलं?

डोंबिवली : गुन्हेगारीच्या सत्य घटनांवर आधारित प्रसिद्ध टीव्ही मालिका 'क्राइम पेट्रोल'च्या (Crime Patrol) माध्यमातून प्रेक्षकांना सावध आणि सतर्क राहण्याचा संदेश दिला जातो. मात्र, याच मालिकेत अनेकदा पोलिसाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेता सतीश नायकोडे स्वतः एका मोठ्या फसवणुकीचे शिकार झाले आहेत. पश्चिम उपनगरात हक्काचे घर घेण्याच्या स्वप्नातून त्यांची तब्बल साडेचोवीस लाख (२४.५ लाख) रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. पडद्यावर गुन्हेगारांचे ट्रॅप उघडकीस आणणारा अभिनेता प्रत्यक्ष आयुष्यात मात्र भामट्यांच्या जाळ्यात अडकला आहे.



डोंबिवली ते मुंबईचा रोजचा प्रवास अन् शूटिंगची तारेवरची कसरत


आपल्यासोबत घडलेल्या या घटनेबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना सतीश नायकोडे (Satish Naykode) यांनी अत्यंत भावुक होत आपली व्यथा मांडली. ते म्हणाले, "गरजवंताला अक्कल नसते असे म्हणतात, ते अगदी खरे आहे. मी मूळचा डोंबिवलीचा रहिवासी असून डोंबिवली हे खूप छान शहर आहे. परंतु, अभिनय क्षेत्रात काम करताना तिथून दररोज मुंबईतील मढ आयलंड, गोरेगाव किंवा बोरीवली भागात शूटिंगसाठी वेळेत पोहोचणे ही मोठी तारेवरची कसरत असायची. पहाटे साडेचारची लोकल पकडणे आणि रात्री पॅकअप झाल्यावर उशिरा घरी परतणे यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा यायचा. यामुळेच मुंबईच्या पश्चिम उपनगरात स्थलांतरित होण्याचा विचार मनात आला."



काम मिळण्यात अडचणी अन् हक्काच्या घराचे स्वप्न


डोंबिवलीत राहत असल्यामुळे अनेक नवीन प्रोजेक्ट्स हातातून निसटत असल्याचे नायकोडे यांनी सांगितले. अनेक प्रॉडक्शन हाऊस त्यांना स्पष्ट सांगायचे की, "तुम्ही वेस्टर्न लाईनला (पश्चिम उपनगरात) शिफ्ट झालात तरच नवीन प्रोजेक्टमध्ये काम देऊ शकू. कारण लांबच्या प्रवासामुळे तुम्ही शूटिंगला पुरेसा वेळ देऊ शकाल का, याची शाश्वती वाटत नाही." या कारणामुळे कामे कमी मिळू लागली. प्रत्येक प्रामाणिक माणसाप्रमाणेच, 'मुंबईत एवढी वर्षे मेहनत करून स्वतःच्या कमाईचे हक्काचे घर असावे' असे साधे स्वप्न नायकोडे यांनी पाहिले होते. डोंबिवलीत वडिलोपार्जित घर असले तरी स्वतःच्या कष्टाने मुंबईत घर घेण्याच्या तीव्र इच्छेने त्यांनी पश्चिम उपनगरात घराचा शोध सुरू केला.



सच्चिदानंद भामरेची एन्ट्री अन् २५ लाखांचा ट्रॅप


पश्चिम उपनगरात बजेटनुसार घर शोधत असताना सतीश नायकोडे यांची भेट सच्चिदानंद भामरे नावाच्या व्यक्तीशी झाली. त्याने त्यांना चाळीतील एक बैठे घर दाखवले. तिथली लोकॅलिटी, आजूबाजूला असलेली मराठी माणसे आणि घराची किंमत बजेटमध्ये वाटल्याने नायकोडे यांचा त्यावर विश्वास बसला. भामरेने दाखवलेली सर्व कागदपत्रे आणि ओळख करून दिलेली माणसे कायदेशीर व योग्य वाटल्यामुळे, मागील १२-१३ वर्षांपासून घर शोधणाऱ्या नायकोडे यांनी कोणताही संशय न घेता व्यवहारासाठी होकार दिला आणि संबंधित व्यक्तीला पैसे हस्तांतरित केले.



साडेआठ वर्षांत ४५ लाख भरूनही ३० लाखांचे कर्ज शिल्लक


घराच्या व्यवहारासाठी नायकोडे यांनी २०१८ मध्ये डोंबिवलीतील आपली वडिलोपार्जित मालमत्ता एका खाजगी फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून कर्ज घेतले. त्यातील २४.५ लाख रुपये भामरे व त्याच्या साथीदारांना देण्यात आले. हा संपूर्ण व्यवहार अधिकृत कागदपत्रांच्या आधारे झाला असून त्याचे सर्व पुरावे नायकोडे यांच्याकडे उपलब्ध आहेत. मात्र, पैसे देऊनही त्यांना घराचा ताबा मिळाला नाही आणि त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. या निर्णयामुळे त्यांच्यावर अफाट आर्थिक ताण आला आहे. सुरुवातीला दरमहा ४५ हजार रुपये आणि सध्या ४२,७०० रुपयांचा EMI ते भरत आहेत. गेल्या साडेआठ वर्षांत त्यांनी बँकेला जवळपास ४५ लाख रुपये व्याज व हप्त्यांच्या स्वरूपात भरले आहेत, तरीही हे कर्ज पूर्ण फेडण्यासाठी आणखी ३० लाख रुपये भरणे बाकी आहे. एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब आर्थिक अडचणीत सापडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

ICC ODI World Cup : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : पुरुषांच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. स्पर्धा सुरू

Foreigners Banned In Indian City : इंग्रजांनी वसवलेलं 'हे' निसर्गरम्य शहर; पण आज तिथेच परदेशी पर्यटकांना बंदी का ? कारण काय ?

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे राज्य आपल्या निसर्गरम्य दऱ्या, शांत पर्वत आणि अप्रतिम निसर्ग

Nashik News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून काँग्रेस विरोधात आंदोलन , 'गुंगी गुडिया'वरून राजकारण तापलं

Nashik News : महाराष्ट्र काँग्रेसच्या (Maharashtra Congress) अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Central Railway New Rule : 'धूम्रपान ते फेरीवाले…' रेल्वेत गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही; रेल्वे कायद्यात झाले 'हे' मोठे बदल

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या

Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

Nashik News : एमएनजीएलची गॅस पाइपलाइन फुटून आगीचा भडका; परिसरात भीतीचे वातावरण

Nashik News : नाशिकच्या म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रोडवर (Mhasrul-Makhmalabad Link Road) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. म्हसरूळ-मखमलाबाद लिंक