प्रभाग समितीच्या रचनेत ‘बविआ’ची बाजी

नियमांच्या गणितात केवळ एक समिती भाजपकडे


 विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्यांची रचना करण्याच्या विषय शुक्रवारी घेण्यात आलेल्या महासभेत चांगलाच गाजला. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने नियमांचे "गणित" मांडून नऊपैकी आठ प्रभाग समित्यांवर आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. तर सदस्य संख्या किंवा जुन्या प्रभाग रचनेनुसार किमान तीन प्रभाग समित्याची अपेक्षा करणाऱ्या भाजपला केवळ एका प्रभाग समितीवर समाधान मानावे लागणार आहे. भाजपच्या ४३ सदस्यांनी या विषयाला विरोध केला असताना, बहुजन विकास आघाडीच्या ७० नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान करून या विषयाला मंजुरी दिली आहे.


वसई-विरार पालिकेच्या निवडणुकीनंतर बहुमताच्या जोरावर बहुजन विकास आघाडी सत्तेत आली आहे. असे असले तरी विरोधकांकडे असलेली ४४ सदस्य संख्या ही बहुजन विकास आघाडीला खटकणारी अशीच आहे. विरार पश्चिमेकडील भाग हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या भागातील प्रभाग क्रमांक दोन आणि पाच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे जुन्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग ए समितीवर भाजपचा सभापती बसण्याचे संकेत होते. तसेच प्रभाग बी आणि डी या प्रभागांमध्ये सुद्धा नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजपचे वर्चस्व आहे.


परिणामी स्थायी समिती सभापती निवडीच्या पूर्वी प्रभागांची रचना आपल्या सोयीनुसार करण्यासाठी बहुजन विकास आघाडीने बऱ्याच दिवसापासून विशेष तयारी चालविली होती. कायदा आणि नियमाच्या आधारे नागरिकांच्या सोयीने जवळ जवळ असणारे प्रभाग एकत्रित करून नवी प्रभाग रचना करण्यात आल्याचा प्रस्ताव सभागृह नेते प्रफुल साने यांनी सभेत मांडला. स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनी या प्रस्तावास अनुमोदन दिले. तर विरोधी पक्षनेते मनोज पाटील आणि गटनेते अशोक शेळके यांनी या विषयाला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यामुळे या विषयासाठी आवाजी मतदान घेण्यात आले. आणि सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर केला. परिणामी बविआचे आठ प्रभाग समिती सभापती राहणार हे स्पष्ट आहे.



प्रभाग समिती ई सभापती पदासाठी तीन नावे चर्चेत


प्रभाग समितीच्या रचनेला भाजपने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या विषयावरून भाजप न्यायालयात हाक देण्याची शक्यता आहे. मात्र भाजपला देखील एक सभापती पद मिळणार असल्याने प्रभाग समिती इ. च्या सभापती पदासाठी भाजपकडून तीन नावे चर्चेत आले आहेत. प्रभाग क्रमांक १५ मधील भाजपच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, प्रभाग क्रमांक १६ चे नीलेश चौधरी आणि प्रभाग क्रमांक १७ मधील जयप्रकाश वझे यांची नावे प्रभाग समिती ई सभापती पदासाठी पुढे आली आहेत.



नव्या प्रभाग रचनेनुसार असे राहील संख्यबळ


नव्या प्रभाग समित्याप्रभाग ए - बविआ ८ - भाजप ४
प्रभाग बी - बविआ ८- भाजप ४
प्रभाग सी - बविआ ८- भाजप ४
प्रभाग डी - बविआ ९ - भाजप ७
प्रभाग ई - बविआ ४- भाजप १२
प्रभाग एफ -बविआ ७ - भाजप ५
प्रभाग जी -बविआ ८- भाजप ४
प्रभाग एच - बविआ ८- भाजप ४
प्रभाग आय - बविआ - ११



नव्या प्रभाग समित्या


प्रभाग ए - प्रभाग क्रमांक - १, २,आणि ३
प्रभाग बी - प्रभाग क्रमांक -४, ५ आणि १२
प्रभाग सी -प्रभाग क्रमांक - ११, १३ आणि १४
प्रभाग डी - प्रभाग क्रमांक -६, ७, ८ आणि १०
प्रभाग ई - प्रभाग क्रमांक -९, ५, १६ आणि १७
प्रभाग एफ - प्रभाग क्रमांक -१८, १९ आणि २१
प्रभाग जी - प्रभाग क्रमांक -२०, २२ आणि २७
प्रभाग एच - प्रभाग क्रमांक - २३, २४ आणि २६


प्रभाग आय - प्रभाग आय -२५, २८ आणि २९

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक