मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूल एप्रिलपर्यंत होणार वाहतूकीसाठी खुला

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड पर्यंत विस्तारित पुलाच्या कामाचा खर्च तब्बल ४० कोटींनी वाढला गेला. आतापर्यंत या विस्तारित पुलाच्या वाढीव खर्च तीन वेळा वाढवला गेला आहे. २०९ कोटी रुपयांवरून या प्रकल्पाचा खर्च २४८ कोटी रुपयांवर पोहोचला गेला आहे. या पुलाचे काम आता पूर्णत्वास आले असून ३० एप्रिल २०२६ पर्यंत ही कामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष वाहतुकीसाठी हा मार्ग खुला होणार आहे.


महापालिकेच्या पुल विभागामार्फत या विस्तारित पुलाच्याकाम हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या कामाला २०१८ मध्ये मंजुरी प्राप्त झाली होती आणि २२ मार्च २०१९ मध्ये या कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी एम इ पी एल - ग्यान या संयुक्त भागीदारीत कंपनीची निवड करण्यात आली होती.


सुरुवातीला या प्रकल्पाची कंत्राट खर्च सुमारे २०९ कोटी रुपये एवढा होता. होती. पावसाला वगळता २४ महिन्यांचा कालावधीत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते.पण पुढे कोविडचा आजार यांमुळे काम थांबले आणि पुढे २०२३ मध्ये याचा वाढवण्याचा प्रस्ताव सादर करून विविध करांसह २०९ कोटींवरून याचा खर्च २४० कोटी रुपये एवढा करण्यास मान्यता देण्यात आली. महापालिका पूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कामाला प्रत्यक्ष सुरुवात केल्यानंतर काही तांत्रिक अडचणी व अतिरिक्त कामांची गरज निर्माण झाली. त्यामुळे प्रशासकीय मंजुरी घेऊन कंत्राट रकमेत सुधारणा करण्यात आली असून कामाचा कालावधीही वाढवण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सुधारित कालावधीनुसार हे काम ३० एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.


मृणाल गोरे रेल्वे उड्डाणपुलाचा मुख्य पूल २०१६ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. सध्या या पुलाच्या दोन्ही बाजूंना सुमारे ३९० मीटर लांबीचा ‘आर्म’ पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच पुलाच्या बांधकामासोबत पादचारी सुविधा, रंगकाम, सुरक्षा उपाययोजना आणि ध्वनिरोधक भिंती (नॉईज बॅरिअर) उभारण्याचाही प्रस्ताव आहे.या अतिरिक्त कामांमुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली असून विविध करांसह हा खर्च एकूण २४८ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.


या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर मृणालताई गोरे पुलाच्या मार्गातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

शिवछत्रपतींविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचे निलंबन करा; मंत्री नितेश राणे विधानसभेत कडाडले

मुंबई: अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधानसभेत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आमदार

जलजीवनच्या कामांसाठी ३१ हजार कोटींच्या निधीची गरज

मंत्री गुलाबराव पाटील यांची विधानसभेत माहिती; रखडलेल्या कामांवरून लोकप्रतिनिधींनाही सुनावले मुंबई : "वर्षाला

मुंबई महापालिकेच्या विधी समिती अध्यक्षपदी दीक्षा कारकर तर बाजार,उद्यान समिती अध्यक्षपदी मीनल तुर्डे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदी मीनल तुर्डे, उपाध्यक्षपदी रिटा

बायपास शस्त्रक्रीयेसाठी एक रुपयाही खर्च येत नाही!

आरोग्य मंत्र्यांची विधानसभेत माहिती; रुग्णालयांनी पैसे मागितल्यास त्वरित कारवाई करणार मुंबई : राज्यातील गरजू

व्हॅल्युअर्सना मिळणार न्याय! महिनाभरात बँकांसोबत विशेष बैठक घेण्याची मंत्री पंकज भोयर यांची विधानपरिषदेत ग्वाही

मुंबई : राज्यातील सुवर्णकार आणि बँकांमध्ये सोने तारण कर्ज प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'गोल्ड

‘तक्रार केल्यास काम अडवू’! सिंधुदुर्गमधील ठाकर बांधवांना अधिकाऱ्यांकडून दमदाटी - आमदार निलेश राणे विधानसभेत आक्रमक

भात खरेदीच्या थकबाकीवरूनही विचारला जाब मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाला जात पडताळणीसाठी ५००