Missing Link' Project: मुंबई-पुण्यातील अंतर कमी होणार, 'मिसिंग लिंक'चं काम पूर्ण; लवकरच प्रवाशांसाठी खुला

मुंबई: बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे. या प्रोजेक्टशी संबंधित असलेल्या एक इंजिनियरने सोशल मिडिया एक्सवर एक व्हिडिओ शेअर करीत याबाबत माहिती दिली. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प इंजिनियरिंगचा अद्भूत नमुना आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबई-पुण्यातील अंतर तब्बल ६ किलोमीटरपर्यंत कमी होईल. इतकच नाही तर २५ ते ३० मिनिटांची प्रवासाचा वेळ वाचेल. मिसिंग प्रकल्पाची एकूण लांबी १३.३ किलोमीटर इतकी आहे. यामध्ये ६५० मीटर लांब केबल ब्रिजचा समावेश आहे. याची एकूण उंची १८२ मीटर (६० मजली इमारत) आहे.


सतीश माने नावाच्या एका वापरकर्त्याने यासंदर्भातील व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्याचं त्यांनी एक्सवर माहिती दिली. माने यांच्या पोस्टनुसार, मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम १२ मार्चला पूर्ण झालं. सूत्रांच्या माहितीनुसार, या मिसिंग लिंक प्रकल्पाचा शुभारंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून होऊ शकतं. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पात टायगर व्हॅलीच्यावर एक ६५० मीटर लांब केबल-स्टेड पुल तयार करण्यात आला आहे. या खांबांची उंची साधारण १८२ मीटर असून ज्यामुळे हा पुल भारतातील सर्वात उंच रस्ते पुलांपैकी एक ठरतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याची उभारणी केली आहे.



कधी सुरू होणार मिसिंग लिंक?



काही दिवसांपूर्वी आलेल्या अपडेटनुसार, या प्रकल्पाचं ९८ टक्के काम पूर्ण झालेलं आहे. १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प तयार करण्यासाठी साधारण ६,६९५ कोटींचा खर्च झाला आहे. या प्रकल्पात दोन मुख्य बोगद्यांचा समावेश आहे. एक बोगदा साधारण ८.९ किलोमीटर लांब आहे. हा देशातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक आहे. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर खंडाळा घाट क्षेत्रात होणारे अपघात आणि लँडस्लाइडमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल.


खोपोली एक्झिटपासून कुसगाव (लोणावळा) पर्यंतचा कठीण आणि वळणदार घाट विभाग या लिंकमुळे दूर होईल. अलिकडेच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एक टँकर उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली तेव्हा याची अत्यंत गरज होती.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा