Missing Link' Project: मुंबई-पुण्यातील अंतर कमी होणार, 'मिसिंग लिंक'चं काम पूर्ण; लवकरच प्रवाशांसाठी खुला

मुंबई: बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे. या प्रोजेक्टशी संबंधित असलेल्या एक इंजिनियरने सोशल मिडिया एक्सवर एक व्हिडिओ शेअर करीत याबाबत माहिती दिली. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प इंजिनियरिंगचा अद्भूत नमुना आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबई-पुण्यातील अंतर तब्बल ६ किलोमीटरपर्यंत कमी होईल. इतकच नाही तर २५ ते ३० मिनिटांची प्रवासाचा वेळ वाचेल. मिसिंग प्रकल्पाची एकूण लांबी १३.३ किलोमीटर इतकी आहे. यामध्ये ६५० मीटर लांब केबल ब्रिजचा समावेश आहे. याची एकूण उंची १८२ मीटर (६० मजली इमारत) आहे.


सतीश माने नावाच्या एका वापरकर्त्याने यासंदर्भातील व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्याचं त्यांनी एक्सवर माहिती दिली. माने यांच्या पोस्टनुसार, मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम १२ मार्चला पूर्ण झालं. सूत्रांच्या माहितीनुसार, या मिसिंग लिंक प्रकल्पाचा शुभारंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून होऊ शकतं. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पात टायगर व्हॅलीच्यावर एक ६५० मीटर लांब केबल-स्टेड पुल तयार करण्यात आला आहे. या खांबांची उंची साधारण १८२ मीटर असून ज्यामुळे हा पुल भारतातील सर्वात उंच रस्ते पुलांपैकी एक ठरतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याची उभारणी केली आहे.



कधी सुरू होणार मिसिंग लिंक?



काही दिवसांपूर्वी आलेल्या अपडेटनुसार, या प्रकल्पाचं ९८ टक्के काम पूर्ण झालेलं आहे. १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प तयार करण्यासाठी साधारण ६,६९५ कोटींचा खर्च झाला आहे. या प्रकल्पात दोन मुख्य बोगद्यांचा समावेश आहे. एक बोगदा साधारण ८.९ किलोमीटर लांब आहे. हा देशातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक आहे. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर खंडाळा घाट क्षेत्रात होणारे अपघात आणि लँडस्लाइडमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल.


खोपोली एक्झिटपासून कुसगाव (लोणावळा) पर्यंतचा कठीण आणि वळणदार घाट विभाग या लिंकमुळे दूर होईल. अलिकडेच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एक टँकर उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली तेव्हा याची अत्यंत गरज होती.

Comments
Add Comment

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली