१ एप्रिलपासून मर्सिडीज-बेंझच्या कार किमतीत २ टक्क्यांची होणार वाढ

मुंबई : जर्मनीची प्रसिद्ध लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने भारतीय बाजारातील ग्राहकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. कंपनीने १ एप्रिल २०२६ पासून भारतातील आपल्या संपूर्ण वाहन पोर्टफोलिओच्या किमतीत सुमारे २ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.


कंपनीच्या मते, परकीय चलन विनिमय दरातील सतत होणारे चढउतार आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. याशिवाय युरोच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे कंपनीच्या एकूण परिचालन खर्चावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यवसायाची दीर्घकालीन स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी किमतीत बदल करणे आवश्यक झाल्याचे कंपनीने सांगितले.


मर्सिडीज-बेंझ इंडियाचे विक्री आणि विपणन उपाध्यक्ष ब्रेंडन सिसिंग यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कंपनी शक्य तितक्या प्रमाणात वाढलेल्या खर्चाचा भार स्वतः उचलण्याचा प्रयत्न करत असते. मात्र सध्याच्या परिस्थितीत व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी किंमतीत सुधारणा करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून सर्व मॉडेल्सच्या किमतीत सरासरी २ टक्क्यांची वाढ लागू केली जाणार आहे.


या निर्णयाचा परिणाम कंपनीच्या सर्व मॉडेल्सवर होणार आहे. भारतात असेंबल केल्या जाणाऱ्या गाड्यांपासून ते पूर्णपणे आयात केल्या जाणाऱ्या लक्झरी कारपर्यंत सर्व वाहनांच्या किमतीत ही वाढ लागू होईल. मात्र ग्राहकांवर त्याचा परिणाम कमी व्हावा यासाठी ही वाढ अत्यंत काळजीपूर्वक लागू केली जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.


दरम्यान, लक्झरी कार बाजारात किमती वाढवण्याचा हा निर्णय केवळ मर्सिडीज-बेंझपुरता मर्यादित नाही. याआधी जर्मनीचीच आणखी एक मोठी वाहन निर्माता कंपनी ऑडीने देखील भारतातील आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती १ एप्रिल २०२६ पासून सुमारे २ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. वाढती इनपुट कॉस्ट आणि चलन विनिमय दरातील अस्थिरता हेच या निर्णयामागचे प्रमुख कारण असल्याचे कंपनीने सांगितले आहे.


लक्झरी वाहनांच्या बाजारात मागणी कायम असली तरी उत्पादन खर्च वाढत असल्याने वाहन कंपन्यांना किंमतवाढीचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे येत्या काळात लक्झरी कार बाजारात अशा प्रकारच्या किंमतवाढीचे निर्णय आणखी कंपन्यांकडून घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय