Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा


मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तेलवाहू जहाज 'ग्रीन आशा' (Green Asha Indian Ship) आज म्हणजेच गुरुवार ९ एप्रिल रोजी मुंबईत दाखल झाले आहे. १५,००० टन एलपीजी घेऊन जाणारे हे जहाज मुंबईत आले आहे. या भारतीय जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून मुंबईत प्रवेश केला आहे.


इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची घोषणाही केली आहे. परिणामी, या काळात आणखी बरीच जहाजे भारतात येऊ शकतात.


'ग्रीन आशा' हे (Green Asha Indian Ship) जहाज १५,४०० टन एलपीजी घेऊन नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) येथे दाखल झाले आहे. जेएनपीएने म्हटले आहे की; "भारतीय ध्वज असलेल्या 'ग्रीन आशा' या एलपीजी जहाजाचे स्वागत करण्यात आले. या जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार करून बीपीसीएल-आयओसीएलद्वारे संचालित जेएनपीएच्या लिक्विड बर्थवर नांगर टाकला."


'ग्रीन आशा'चे (Green Asha Indian Ship) आगमन महत्त्वपूर्ण आहे, कारण युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझची सामुद्रधुनी पार करून जेएनपीएमध्ये पोहोचणारे हे अशा प्रकारचे पहिलेच जहाज आहे. हे जहाज १५,४०० टन एलपीजी घेऊन आले आहे. प्राधिकरणाने म्हटले आहे, "जहाज, त्यावरील माल आणि सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. हे आगमन गुंतागुंतीच्या भू-राजकीय परिस्थितीतही सागरी कारवायांची कार्यक्षमता दर्शवते आणि देशाला अत्यावश्यक एलपीजीचा अखंड पुरवठा सुनिश्चित करते."


दरम्यान इराणकडून होर्मुज सामुद्रधुनी संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इराणने आता जहाजांच्या वाहतुकीसाठी पर्यायी समुद्री मार्गांची घोषणा केली आहे.



सामुद्रधुनीचे पर्यायी मार्ग :


प्रवेश मार्ग : ओमान समुद्रातून होर्मुज सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) प्रवेश करणारी जहाजे आता लारक बेटाच्या उत्तरेकडील भागातून प्रवास करतील. त्यानंतर ती पर्शियन आखाताच्या दिशेने पुढे जातील. संभाव्य धोक्यांपासून बचाव करत सुरक्षित प्रवेश मिळावा हा या मार्गाचा उद्देश आहे.


निर्गमन मार्ग : आखातातून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठीही नवीन मार्ग निश्चित करण्यात आला आहे. ही जहाजे लारक बेटाच्या दक्षिणेकडील भागातून ओमान समुद्राच्या दिशेने रवाना होतील.


इराणचे म्हणणे आहे की, या नव्या मार्गांचा उद्देश जहाजांना सुरक्षित आणि अखंड प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. जलमार्गात कोणतीही अप्रिय घटना टाळणे आणि आंतरराष्ट्रीय नौवहन सुरळीत ठेवणे, या दिशेने हा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचेही इराणने स्पष्ट केले आहे. (Iran-US-Israel War)

Comments
Add Comment

Mumbai Housing Project : मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना मिळणार गती; झोपडपट्टी पुनर्वसनासाठी धोरणात्मक सुधारणा

सुरक्षित व परवडणाऱ्या घरांसाठी सरकार कटिबद्ध; पुनर्विकास प्रकल्पांना वेग मुंबई : मुंबई आणि उपनगरांतील

Mumbai : मुंबईत पावसाची संततधार, अंधेरी सब वे, मुलुंडसह अनेक भागांमध्ये पाणी साचले

मुंबई : मागील दोन - तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारीही सकाळपासून पावसाने जोरदार

Chembur School Bus Accident : चेंबूर दुर्घटनेतील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करा; आरक्षण उपवर्गीकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – एकनाथ शिंदे

आरक्षण उपवर्गीकरणावर चर्चेतून तोडगा काढणार; संघर्ष समितीला शिंदेंचे आश्वासन मुंबई : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर

Asiatic Library: एशियाटिक लायब्ररीच्या संवर्धनासाठी ५.६३ कोटींची कामे; जुलैअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

एशियाटिक लायब्ररीच्या जतनासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ५६३.३३ लाखांचा निधी मंजूर मुंबई : राज्याच्या

AI Smart Glasses : एआय स्मार्ट चष्म्यांचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य सरकार स्थापन करणार तज्ज्ञ समिती

AI Smart Glasses : मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित स्मार्ट चष्मे, स्मार्ट गॉगल्स आणि इतर वेअरेबल (अंगावर परिधान करता

Bishnoi : बिश्नोई टोळीसह भाडोत्री गुंडांचा बंदोबस्त करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; परदेशातील 'व्हीपीएन कॉल्स' आणि 'मास्किंग'चे जाळे उद्ध्वस्त करणार मुंबई : परदेशात