Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा


मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तेलवाहू जहाज 'ग्रीन आशा' (Green Asha Indian Ship) आज म्हणजेच गुरुवार ९ एप्रिल रोजी मुंबईत दाखल झाले आहे. १५,००० टन एलपीजी घेऊन जाणारे हे जहाज मुंबईत आले आहे. या भारतीय जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून मुंबईत प्रवेश केला आहे.


इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची घोषणाही केली आहे. परिणामी, या काळात आणखी बरीच जहाजे भारतात येऊ शकतात.


'ग्रीन आशा' हे (Green Asha Indian Ship) जहाज १५,४०० टन एलपीजी घेऊन नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) येथे दाखल झाले आहे. जेएनपीएने म्हटले आहे की; "भारतीय ध्वज असलेल्या 'ग्रीन आशा' या एलपीजी जहाजाचे स्वागत करण्यात आले. या जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार करून बीपीसीएल-आयओसीएलद्वारे संचालित जेएनपीएच्या लिक्विड बर्थवर नांगर टाकला."


'ग्रीन आशा'चे (Green Asha Indian Ship) आगमन महत्त्वपूर्ण आहे, कारण युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझची सामुद्रधुनी पार करून जेएनपीएमध्ये पोहोचणारे हे अशा प्रकारचे पहिलेच जहाज आहे. हे जहाज १५,४०० टन एलपीजी घेऊन आले आहे. प्राधिकरणाने म्हटले आहे, "जहाज, त्यावरील माल आणि सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. हे आगमन गुंतागुंतीच्या भू-राजकीय परिस्थितीतही सागरी कारवायांची कार्यक्षमता दर्शवते आणि देशाला अत्यावश्यक एलपीजीचा अखंड पुरवठा सुनिश्चित करते."


दरम्यान इराणकडून होर्मुज सामुद्रधुनी संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इराणने आता जहाजांच्या वाहतुकीसाठी पर्यायी समुद्री मार्गांची घोषणा केली आहे.



सामुद्रधुनीचे पर्यायी मार्ग :


प्रवेश मार्ग : ओमान समुद्रातून होर्मुज सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) प्रवेश करणारी जहाजे आता लारक बेटाच्या उत्तरेकडील भागातून प्रवास करतील. त्यानंतर ती पर्शियन आखाताच्या दिशेने पुढे जातील. संभाव्य धोक्यांपासून बचाव करत सुरक्षित प्रवेश मिळावा हा या मार्गाचा उद्देश आहे.


निर्गमन मार्ग : आखातातून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठीही नवीन मार्ग निश्चित करण्यात आला आहे. ही जहाजे लारक बेटाच्या दक्षिणेकडील भागातून ओमान समुद्राच्या दिशेने रवाना होतील.


इराणचे म्हणणे आहे की, या नव्या मार्गांचा उद्देश जहाजांना सुरक्षित आणि अखंड प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. जलमार्गात कोणतीही अप्रिय घटना टाळणे आणि आंतरराष्ट्रीय नौवहन सुरळीत ठेवणे, या दिशेने हा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचेही इराणने स्पष्ट केले आहे. (Iran-US-Israel War)

Comments
Add Comment

Ritu Tawde : धमक्यांना घाबरत नाही, बॉम्बस्फोट धमकीच्या ईमेल वर महापौर रितू तावडेंची प्रतिक्रिया

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आज मंगळवारी १० जून २०२६ रोजी सकाळी नऊ वीस (९:२०) च्या सुमारास मला धमकी देणारा एक ईमेल आला. या

BEST ACCIDENT : मुंबईत बेस्ट बसचा पुन्हा थरार, कांदिवलीत दोघांना चिरडले; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

MUMBAI : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट बसच्या अपघातांची मालिका थांबता थांबत नाहीये. दादर येथील बस

Fire Station : चांदिवलीमध्ये अग्निशमन दलाची होणार उभारणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) चांदिवली (Chandiwali)  येथे नव्याने अग्निशमन केंद्र (Fire station) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या

BMC News : सखल भागांमध्ये अश्वशक्तीने महापालिका करणार प्रयत्न, साचलेले पाणी उचलून फेकणार

- मुंबईतील आठ ठिकाणी पुढील तीन वर्षांसाठी भाडेतत्वावर पंपाची सुविधा - तब्बल १२३ कोटी रुपये करणार खर्च मुंबई (सचिन

BMC News : रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल १४ कंत्राटदारांची निवड, यंदा केवळ ४२ कोटींचीच कामे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या मोठ्याप्रमाणात सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आल्यामुळे

Tree Plantation on Coastal Road : विस्तारीत कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पात १७७८ झाडे बाधित, बदल्यात लावणार सुमारे १६ हजार झाडे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई किनारी रस्ते प्रकल्प (उत्तर) वर्सोवा आंतरबदल ते दहिसर भाईंदर मार्गावरील दहिसर