"काँग्रेसकडे निराशेत स्वतःचे कपडे फाडण्याव्यतिरिक्त काहीही शिल्लक नाही"; पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

- सततच्या पराभवातून आलेल्या नैराश्यातूनच काँग्रेसचा देशाविरोधात मोर्चा


आसाम सोबतच देशातील बहुतेक राज्यांमध्ये जनतेने काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे सतत हरणारी काँग्रेस लवकरच पराभवाचे शतक पूर्ण करेल. पराभवाच्या याच नैराश्यातून काँग्रेसने देशविरोधात मोर्चा उघडल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आसाममध्ये आज, शनिवारी (१४ मार्च) पंतप्रधानांच्या हस्ते शिलाँग–सिलचर कॉरिडोरचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.


याप्रसंगी गेल्या महिन्यात भारत मंडपम येथे झालेल्या एआय समिटदरम्यान काँग्रेस सदस्यांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, एआय समिटला बदनाम करण्याच्या प्रयत्नात काँग्रेसने विचित्र प्रकारचे आंदोलन केले. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी स्वतःचे कपडे फाडून निषेध नोंदवला.या आंदोलनावर टीका करताना मोदी म्हणाले की, आता काँग्रेसकडे निराशेत स्वतःचे कपडे फाडण्याव्यतिरिक्त काहीही शिल्लक नसल्याचे दिसून येते.





आसामच्या युवकांविषयी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, काँग्रेसने असमला ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाची प्रयोगशाळा बनवली होती. मात्र आज असमच्या युवकांसमोर संधींचे विस्तीर्ण आकाश खुले झाले आहे. तसेच काँग्रेसने ईशान्य भारताला अनेक वर्षे दुर्लक्षित केले. स्वातंत्र्यानंतर सीमारेषा अशा पद्धतीने निश्चित करण्यात आल्या की बराक खोऱ्याचा समुद्राशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटल्याचे मोदींनी नमूद केले. बराक खोरे एकेकाळी महत्त्वाचे व्यापारमार्ग आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जात होते, पण त्याची ताकद हिरावून घेतली गेली. स्वातंत्र्यानंतरही अनेक दशकं काँग्रेस सत्तेत होती, तरीही बराक खोऱ्याच्या विकासासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नसल्याची टीका त्यांनी केली.


पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले की, असममधील भाजपच्या नेतृत्वाखालील डबल-इंजिन सरकार बराक खोऱ्याला बदलण्यासाठी आणि त्याला पुन्हा व्यापार व उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र बनवण्यासाठी काम करत आहे. जिथे काँग्रेसची विचारसरणी संपते, तिथून आमचे काम सुरू होते. हा ईशान्य भारतातील पहिला एक्सेस-कंट्रोल्ड हाय-स्पीड कॉरिडोर असेल. हा केवळ महामार्ग प्रकल्प नाही, तर ईशान्य भारतातील लोकांच्या दशकांपासूनच्या प्रतीक्षेचा अंत असल्याचे मोदींनी सांगितले.

Comments
Add Comment

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :

Meta आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार ?

- एआय तंत्रज्ञानातील वाढत्या स्पर्धेमुळे कर्मचारी संरचनेत बदल मेटा प्लॅटफॉर्म ही फेसबुक आणि इंस्टाग्राम या

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

संजय राऊत देशात अराजकता निर्माण करत आहेत; भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

- आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली मुंबई : उबाठा खासदार संजय राऊत हे पत्रकार परिषदांमधून

Iran-US-Israel War : इराणचा सौदीतील अमेरिकन तळावर क्षेपणास्त्र हल्ला; हवेत इंधन भरणारी ५ टँकर विमाने नुकसानग्रस्त

- अमेरिकेचे हजारो कोटींचे नुकसान इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे