Railway LPG Shortage : इंधन संकटाचा रेल्वे खानपान सेवेला फटका; वडापाव-समोसे मेन्यूमधून गायब होणार?

मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक खाद्यपदार्थ विक्रेत्यांना गॅस पुरवठ्यात घट झाल्यामुळे नियमित कामकाज सुरू ठेवण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.


पश्चिम आशियातील तणावामुळे व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) सारख्या मोठ्या स्थानकांवरील खाद्यान्न स्टॉल्सवर वडापाव आणि समोसे मिळणे कठीण झाले आहे.



लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ताज्या अन्नाऐवजी तयार पाकिटे :


आयआरसीटीसीच्या (IRCTC) शिवडी येथील क्लाउड किचनमधून दररोज मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ४,५०० प्रवाशांसाठी जेवण तयार केले जाते. मात्र, गॅसअभावी ताज्या अन्नाच्या उत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. याचा परिणाम वंदे भारत, राजधानी आणि तेजस एक्सप्रेससारख्या प्रीमियम गाड्यांवर झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राजधानी एक्सप्रेससारख्या गाड्यांच्या पेंट्री कारमध्ये आता ‘रेडी-टू-ईट’ (Ready-to-Eat) अर्थात तयार अन्नाचा साठा ठेवला जात आहे. ताज्या जेवणाची कमतरता भासल्यास प्रवाशांना हे पर्याय दिले जातील.



मुंबई लोकलच्या प्रवाशांची मोठी गैरसोय :


मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सवर तळलेले पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅसची गरज लागते. एलपीजी टंचाईमुळे आता वडापाव, समोसा आणि ब्रेड पकोडा यांसारखे लोकप्रिय पदार्थ गायब होण्याची चिन्हे आहेत. पश्चिम रेल्वेच्या ४६० हून अधिक आणि मध्य रेल्वेच्या १९४ स्टॉल्सवर ही समस्या जाणवत आहे. रेल्वे प्रशासनाने आता विक्रेत्यांना गॅसऐवजी इंडक्शन (Induction) आणि मायक्रोवेव्ह (Microwave) सारख्या विद्युत उपकरणांचा वापर करून अन्न गरम करण्याचे किंवा बनवण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :

ई-रिक्षां व ई-बाईकसाठीही परमिट (परवाना ) बंधनकारक करण्याचा निर्णय -- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित

येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित

स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदी यामिनी जाधव, उपनगरे समिती अध्यक्षपदी संगिता शर्मा यांची निवड

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव तर उपाध्यक्षपदी

महापालिका शाळांमध्ये पोषक आहार अद्याप तरी सुरळीतच; संस्थांना सिलिंडर पुरवण्यासाठी रेशनिंग कंट्रोलला महापालिका प्रशासनाच्या सूचना

मुंबई: मुंबईत इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महापालिका शाळांमध्ये गॅस सिलिंडरमुळे मुलांच्या तोंडची खिचडी

स्थायी समितीच्या सभांमधून प्लास्टिक पाण्याचा बॉटल्स हद्पार

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आता कारभारात अमुलाग्र बदल केला जात असून सभा बैठकीमध्ये