कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी


मुंबई : मुंबईची नैसर्गिक संरक्षक भिंत समजल्या जाणाऱ्या कांदळवनांवर भू-माफियांनी डल्ला मारला असून, बोरीवलीत सुमारे ५० एकर कांदळवनांची कत्तल करून तिथे अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि झेप्टोसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची बेकायदा गोदामे उभारण्यात आल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी गुरुवारी विधानसभेत केला. या प्रकरणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.


या गंभीर तक्रारीची दखल घेत, 'गुगल मॅपिंग'च्या आधारे जुन्या नकाशांची पडताळणी करून चौकशी केली जाईल आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात दिले. उपाध्याय यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, बोरीवलीच्या बोरकर कंपाऊंड परिसरात हे अतिक्रमण झाले आहे. या ठिकाणी कांदळवने तोडून मोठा भराव टाकण्यात आला असून तिथे पत्र्याची गोदामे आणि ताडपत्र्यांचे गाळे उभारले आहेत. विशेष म्हणजे, या जमिनीवर पिढ्यानपिढ्या मासे सुकवण्याचे काम करणाऱ्या स्थानिक मच्छिमार बांधवांना आणि तिथे खेळणाऱ्या मुलांना आता बाऊन्सर्समार्फत दमदाटी केली जात आहे. लोकप्रतिनिधी पाहणीसाठी गेले असता त्यांनाही बाऊन्सर्सच्या अरेरावीचा सामना करावा लागल्याचे उपाध्याय यांनी नमूद केले.


अतिक्रमित जमिनींवर गोहत्या


महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी एस. जी. कवठे हे या अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत उपाध्याय यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली. "एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना दुसरीकडे संबंधित जमिनीवर गोहत्येसारखे प्रकारही घडत आहेत," असा गंभीर दावाही त्यांनी यावेळी केला. आमदार मनिषा चौधरी यांनीही या प्रश्नी आक्रमक पवित्रा घेत कांदळवन कत्तल रोखण्यासाठी महसूल आणि वन विभागाची संयुक्त समिती स्थापन करण्याची मागणी केली.


उच्चस्तरीय बैठक घेणार - वनमंत्री


वनमंत्री गणेश नाईक यांनी उत्तरात स्पष्ट केले की, "विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर वन, महसूल, महानगरपालिका आणि पोलीस दलातील उच्चाधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली जाईल. या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित केले जाईल. कांदळवनांचे नुकसान झाले असल्यास सॅटेलाईट इमेज आणि गुगल मॅपिंगच्या आधारे सत्य शोधून काढले जाईल."

Comments
Add Comment

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात

सुधीर मुनगंटीवार आणि विधानसभा अध्यक्षांमध्ये नियमावलीवरून जुंपली

संविधानातील कलमाचा दाखला देत नार्वेकरांनी फटकारले; खासगी विधेयकावरून विधानसभेत खडाजंगी मुंबई : सरकारी