चैत्र चाहूल २०२६ चे 'ध्यास' आणि रंगकर्मी सन्मान

मुंबई : गेली दोन दशके गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर “चैत्र चाहूल” हा मराठी संस्कृती आणि मराठी भाषेला वाहिलेला कार्यक्रम 'ॲड फिझ' करतो. यानिमित्ता ने काही दिग्गज कलाकारांचे ऋण सत्कार आणि कलेसाठी अवघे आयुष्य समर्पित करणाऱ्यांना “ध्यास सन्मानाने” गौरविले जाते. यंदाचा हा सोहळा गुरुवार दिनांक १९ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवीं, मुंबई येथे संपन्न होणार आहे.


गेल्या एकोणीस वर्षात ज्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली ते मान्यवर: सुलभाताई देशपांडे, गुरू पार्वती कुमार, राजा मयेकर, मधुकर तोरडमल, प्रा. शंकर वैद्य, सुलोचना चव्हाण, प्रा. वामन केंद्रे, अभिराम भडकमकर, प्रकाश खांडगे, सूनिल शानबाग, संध्या पुरेचा आणि ज्यांचा सन्मान केला ते ध्यास पुरस्कार: अरुण होर्णेकर, संजना कपूर, गणपत म्हसगे, चंद्गकांत काळे, माधुरी पुरंदरे, अरुण काकडे, कांचन सोनटक्के, अविनाश गोडबोले, ओमप्रकाश चव्हाण, सुधीर नांदगावकर, विदयाधर निमकर, अतुल पेठे रंगकर्मी पुरस्कार : मुक्ता बर्वे, प्रदीप मुळये, प्रसाद ओक, विजय केंकरे, विजयकुमार नाईक, चंद्रकांत कुलकर्णी, दत्त्ता पाटील, अजित भगत, विश्वास सोहनी, फैयाज शेख, मनोहर गोलांबरे.


यंदा पुण्याच्या 'सुदर्शन रंगमंच'च्या शुभांगी दामले यांचा 'ध्यास सन्माना'ने आणि प्रख्यात लेखक आणि भाष्यकार सुरेश गोसावी यांचा 'रंगकर्मी सन्माना'ने गौरव करण्यात येणार आहे.


'चैत्र चाहूल'च्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या विषयावर मनोरंजनाचा सोहळा होतो. यंदाचे वर्ष ही त्याला अपवाद नाही. यावर्षी विद्याधर पुंडलिक यांच्या माळ या कथेचे अभिवाचन प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले सादर करणार आहेत. सृजन संस्कार आणि प्रकाश योजना प्रदीप मुळ्ये यांची आहे आणि संगीत राहुल रानडे यांचे आहे.


डॉ अश्विनी भिडे-देशपांडे यांचा खास 'चैत्र चाहूल' साठी निर्माण केलेला “रंग विठ्ठल“ हा अभंगाचा कार्यक्रम उत्तरार्धात असेल. त्याला साथ देतील तबला - यती भागवत, संवादिनी- ज्ञानेश्वर सोनवणे, तालवाद्य - सुर्यकांत सुर्वे, पखवाज- हनुमंत रावडे, बासरी - अमर ओक, स्वरसाथ- निमिष कैकाडी, स्वरांगी मराठे, स्वराली जोशी.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून काही रांगा आरक्षित असून प्रथम येणाऱ्यांस प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात