Pod Taxi : लवकरच मुंबईत धावणार भारतातील पहिली 'पॉड टॅक्सी'

मुंबई : मुंबई शहरं हे कधीच विश्रांती घेत नाही इथे २४ तास सतत वर्दळ पाहायला मिळते असते. मुंबईत लोकांची गर्दी रात्रंदिवस पाहायला मिळते. काहीजण कामानिमित्त तर काहीजण इतर गोष्टींसाठी घराबाहेर पडतातच. त्यामुळे याठिकाणी प्रवासासाठी सोयीस्कर वाहनांची गरज असते. याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन पॉड टॅक्सी प्रकल्प मुंबईत आणला असून मंगळवारी याचं भूमी पूजनदेखील करण्यात आलं. या पॉड टॅक्सीचा वापर सोपा आणि सोयीस्कर असणार आहे. त्यामुळे या नवीन प्रकल्पामुळे आता मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.


मुंबईकरांना सगळ्यात वर्दळीच्या भागात आणि मध्यभागी असलेल्या कुर्ला आणि बीकेसी बांद्रा कुर्ला कॉम्लेक्समध्ये या टॅक्सीनं प्रवास करता येणार येणार आहे. यामुळे बीकेसी वाहतूक कोंडी आता कमी होईल अशी अपेक्षा प्रवाशांना आहे. विशेष म्हणजे यामुळे तिथे जाणाऱ्या नोकरदार वर्गाचा प्रवास सुरळीत आणि अधिक सोयीस्कर होईल.


हा प्रकल्प मुंबई मेट्रोपॅालिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) ने हाती घेतला आहे. याचा प्रवास मुंबईकरांना कुर्ला आणि ब्रांदा कॉम्पलेक्सच्यामध्ये करता येणार आहे. कारण बीकेसी हे एक महत्वाचं कर्मशिअल हब झालं आहे. याठिकाणी अनेक मल्टीनॅशनल कंपन्या, बँका, इंडियन न्यूज पेपर सोसायटी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, कॅफेस, मोठे हॉटेल्स, भारत डायमंड बॉर्स आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनेकजण मोठ्या संख्येने नोकरीसाठी रोज प्रवास करत असतात.


या पॉड टॅक्सीसाठी २२ एअर-कंडीशर स्टेशन उभारण्यात येतल. हा एकूण ८.८५ किलोमीटरचा प्रकल्प आहे. जो टप्प्याटप्प्याने विकसित केला जाणार आहे. याची लांबी साधारण २०० मीटर इतकी असेल.


यामध्ये सुरुवातीला बांद्रा ईस्टपासून ते कुर्ला यामध्ये ३.३६ किलोमीटरचे अंतर कव्हर केले जाणार आहे. तसेच यामध्ये ६ लोकांना बसण्याची जागा मिळेल. या पॉड टॅक्सीचा स्पीड हा ४० किलोमीटर प्रति तास असणार आहे. तसेच, या टॅक्सीत ६ लोकांना बसण्याची जागा मिळेल. ही टॅक्सी १५ सेंकदाने ग्राहकांनी सांगितलेल्या ठिकाणी थांबणार असून यामुळे आता प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

Comments
Add Comment

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य

Devendra Fadnavis : पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावा

मुंबई : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध

Nitesh Rane : मोर्शीतील अत्याधुनिक मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

अमरावती : राज्यातील मत्स्य शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात

Drugs Free Mumbai : 'ड्रग्स फ्री मुंबई' मॉडेलचा राज्यभर विस्तार; राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समिती' स्थापन होणार

मुंबई : मुंबई शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल आता

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त