Pod Taxi : लवकरच मुंबईत धावणार भारतातील पहिली 'पॉड टॅक्सी'

मुंबई : मुंबई शहरं हे कधीच विश्रांती घेत नाही इथे २४ तास सतत वर्दळ पाहायला मिळते असते. मुंबईत लोकांची गर्दी रात्रंदिवस पाहायला मिळते. काहीजण कामानिमित्त तर काहीजण इतर गोष्टींसाठी घराबाहेर पडतातच. त्यामुळे याठिकाणी प्रवासासाठी सोयीस्कर वाहनांची गरज असते. याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन पॉड टॅक्सी प्रकल्प मुंबईत आणला असून मंगळवारी याचं भूमी पूजनदेखील करण्यात आलं. या पॉड टॅक्सीचा वापर सोपा आणि सोयीस्कर असणार आहे. त्यामुळे या नवीन प्रकल्पामुळे आता मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.


मुंबईकरांना सगळ्यात वर्दळीच्या भागात आणि मध्यभागी असलेल्या कुर्ला आणि बीकेसी बांद्रा कुर्ला कॉम्लेक्समध्ये या टॅक्सीनं प्रवास करता येणार येणार आहे. यामुळे बीकेसी वाहतूक कोंडी आता कमी होईल अशी अपेक्षा प्रवाशांना आहे. विशेष म्हणजे यामुळे तिथे जाणाऱ्या नोकरदार वर्गाचा प्रवास सुरळीत आणि अधिक सोयीस्कर होईल.


हा प्रकल्प मुंबई मेट्रोपॅालिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) ने हाती घेतला आहे. याचा प्रवास मुंबईकरांना कुर्ला आणि ब्रांदा कॉम्पलेक्सच्यामध्ये करता येणार आहे. कारण बीकेसी हे एक महत्वाचं कर्मशिअल हब झालं आहे. याठिकाणी अनेक मल्टीनॅशनल कंपन्या, बँका, इंडियन न्यूज पेपर सोसायटी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, कॅफेस, मोठे हॉटेल्स, भारत डायमंड बॉर्स आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनेकजण मोठ्या संख्येने नोकरीसाठी रोज प्रवास करत असतात.


या पॉड टॅक्सीसाठी २२ एअर-कंडीशर स्टेशन उभारण्यात येतल. हा एकूण ८.८५ किलोमीटरचा प्रकल्प आहे. जो टप्प्याटप्प्याने विकसित केला जाणार आहे. याची लांबी साधारण २०० मीटर इतकी असेल.


यामध्ये सुरुवातीला बांद्रा ईस्टपासून ते कुर्ला यामध्ये ३.३६ किलोमीटरचे अंतर कव्हर केले जाणार आहे. तसेच यामध्ये ६ लोकांना बसण्याची जागा मिळेल. या पॉड टॅक्सीचा स्पीड हा ४० किलोमीटर प्रति तास असणार आहे. तसेच, या टॅक्सीत ६ लोकांना बसण्याची जागा मिळेल. ही टॅक्सी १५ सेंकदाने ग्राहकांनी सांगितलेल्या ठिकाणी थांबणार असून यामुळे आता प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

Comments
Add Comment

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Mumbai Crime : हायप्रोफाइल टॉवरमध्ये सुरू होता ड्रग्जचा काळाबाजार; उग्र वासामुळे पोलिसांनी टाकला छापा, मैत्रिणीसह तिघे ताब्यात...

Crime News : दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील हायप्रोफाइल यास्मीन टॉवरमध्ये सुरू असलेला ड्रग्जचा मोठा रॅकेट मुंबई