Bmc News : मुंबईत ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा

महापालिकेत ठरावाच्या सूचनेद्वारे झाली मागणी


मुंबई : शहरात झपाट्याने वाढणाऱ्या ई-कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यात यावा. यासाठी ई-कचऱ्याचे उगमस्थानीच वर्गीकरण सक्तीचे करण्याची मागणी करण्यात येत आहे. अशाप्रकारे अंमलबजावणी करून सक्ती केल्यास ई-कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट आणि पुनर्वापर सुलभ होऊन पर्यायाने पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होईल असे विश्वास व्यक्त केला जात आहे.


भाजपचे नगरसेवक तेजिंदरसिंग तिवाना यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली आहे. यामध्ये त्यांनी असे नमुद केले आहे की, जागतिक शहरांच्या तुलनेत मुंबईमध्ये ई-कचऱ्याचे प्रमाण वेगाने वाढत असून, यामागे बँका, माहिती तंत्रज्ञान कंपन्या तसेच नागरिकांकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बदलांचा मोठा वाटा आहे. मात्र, योग्य व्यवस्थापनाच्या अभावामुळे या कचऱ्यामुळे गंभीर धोके निर्माण होत आहेत.


ई-कचऱ्यातील लिथियम बॅटरी, सर्किट बोर्ड यांसारखी धोकादायक उपसाधने सध्या सुक्या कचऱ्यात मिसळली जातात. परिणामी, कचरा डेपोमध्ये वारंवार आगी लागून त्या अनेक दिवस धुमसत राहतात. या आगीमधून निर्माण होणाऱ्या विषारी वायूंमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आले असल्याचा दाखला देत तिवाना यांनी या पार्श्वभूमीवर, ओला आणि सुका कचरा जसा वेगळा गोळा केला जातो, त्याच धर्तीवर ई-कचऱ्याचेही उगमस्थानी वर्गीकरण करणे अनिवार्य करण्यात यावे, अशी ठाम भूमिका मांडली आहे.


या ई कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीकोनातून महानगरपालिकेने ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र निधी, कार्यप्रणाली आणि प्रशिक्षित कर्मचारीवर्ग नेमून संपूर्ण व्यवस्थापन स्वतःकडे घेण्याचीही सूचना केली आहे. या निर्णयामुळे ई-कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट आणि पुनर्वापर सुलभ होऊन पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही तिवाना यांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या