मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती; मंत्री नितेश राणे यांची संकल्पना

मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती घडवण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. त्यानुसार, आता या विभागात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर आणखी वाढवला जाणार असून, त्याद्वारे मासेमारीचा डेटा आणि माहिती संकलित करून व्यवसायाला नवी दिशा दिली जाणार आहे.


या संदर्भात सोमवारी मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत 'मार्वल' कंपनीकडून प्रगत प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. राज्यातील मासेमारी क्षेत्रातील अचूक माहिती संकलित करणे, डेटाचे विश्लेषण करणे आणि त्याचा प्रभावी वापर करून मच्छिमारांना अधिक सक्षम करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी पदुमचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय सहआयुक्त ऋता दीक्षित, मार्वल कंपनीचे संचालक साईकृष्णा बुडमगंटा आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (ऑनलाईन) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


मत्स्य व्यवसायासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दळणवळण सुविधांच्या आधुनिकीकरणावरही बैठकीत भर देण्यात आला. जिल्ह्यातील कणकवली आणि तळेरे या महत्त्वाच्या बसस्थानकांचा सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर विकास केला जाणार आहे. या प्रस्तावाबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली विस्तृत चर्चा झाली.


नव्या आराखड्यानुसार, ही बसस्थानके आधुनिक सुविधांनी सज्ज असतील. प्रवाशांसाठी अद्ययावत सोयी, परिसराचे सुयोग्य नियोजन आणि व्यावसायिक संधी लक्षात घेऊन ही उभारणी केली जाणार आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर, बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक दिनेश महाजन व अन्य अभियांत्रिकी अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत तांत्रिक बाजू मांडल्या. या निर्णयामुळे कोकणातील प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Comments
Add Comment

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

Nashik: 'कुंभमेळा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा महोत्सव'

नाशिक: आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्या संदर्भात नाशिकमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ

‘समग्र शिक्षा’ अभियानाच्या भविष्यातील आराखड्याबाबत केंद्र शासनाकडून मार्गदर्शन मागविले; महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेची माहिती

मुंबई: ‘समग्र शिक्षा’ ही केंद्र शासनाची योजना देशात सर्वत्र राबवली जाते. समग्र शिक्षा योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत

Akola Crime News : अकोला हादरलं! 'धुरंधर' सिनेमा पाहून आले अन् दिवसाढवळ्या तिघांवर सपासप वार

अकोला : नांदेडमधील तिहेरी हत्याकांड ताजे असतानाच आता अकोला शहरातही तशीच धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कौलखेड

वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘महाराष्ट्र ज्ञान सभा-2026’राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नागपूर : वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे

Pune Railway Station : पुणे - रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट

पुणे : पुणे स्थानकाच्या मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये सहा नवीन फलाट होणार आहेत. फलाट क्रमांक ७ ते १२ असे