भारत- चीन एकमेकांचे प्रतिस्पर्धी नव्हे तर भागीदार: चीनी परराष्ट्रमंत्री

बीजिंग : भारत आणि चीन यांनी एकमेकांना प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे तर भागीदार म्हणून पाहिले पाहिजे. दोन्ही देशांनी एकमेकांकडे धोका म्हणून नव्हे तर संधी म्हणून पाहण्याची गरज आहे, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी रविवारी सांगितले.


चीनच्या संसद नॅशनल पीपल्स काँग्रेस (एनपीसी) च्या अधिवेशनादरम्यान आयोजित वार्षिक पत्रकार परिषदेत वांग यी बोलत होते. ते म्हणाले की दोन्ही देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ठरवून दिलेल्या दिशानिर्देशांनुसार संबंध पुढे नेले पाहिजेत. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी असेही सांगितले की दोन्ही देशांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या आयोजनात एकमेकांना पाठिंबा दिला पाहिजे. यावर्षी भारत ब्रिक्स परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे, तर २०२७ मध्ये चीन या परिषदेचे आयोजन करणार आहे.


वांग यी यांनी सांगितले की गेल्या वर्षी तियानजिन येथे नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची झालेली भेट सकारात्मक ठरली होती. त्यांनी म्हटले की २०२४ मध्ये रशियातील कजान येथे झालेल्या बैठकीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांना नवी सुरुवात मिळाली आणि त्यानंतर तियानजिनमध्ये झालेल्या चर्चेमुळे संबंध अधिक सुधारण्यास मदत झाली.ते म्हणाले की अलीकडच्या काळात दोन्ही देशांदरम्यान राजनैतिक संवाद, व्यापार आणि लोकांमधील संपर्क वेगाने वाढला आहे. द्विपक्षीय व्यापाराने नवा विक्रम प्रस्थापित केला असून त्याचा थेट फायदा दोन्ही देशांच्या जनतेला झाला आहे.


भविष्यातील दिशेबाबत बोलताना वांग यी म्हणाले की भारत आणि चीन यांनी शेजारी देश म्हणून मैत्री कायम ठेवली पाहिजे आणि सीमावर्ती भागात शांतता व स्थैर्य सुनिश्चित केले पाहिजे. तसेच दोन्ही देशांनी विकास आणि सहकार्यावर अधिक भर द्यायला हवा. ते म्हणाले की भारत आणि चीन हे ग्लोबल साउथमधील महत्त्वाचे देश आहेत आणि दोघांमध्ये सखोल ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध आहेत. परस्पर विश्वास आणि सहकार्यामुळे दोन्ही देशांच्या विकासाला गती मिळू शकते, तर संघर्ष आणि विभाजन आशियाच्या विकासासाठी हानिकारक ठरू शकते.


दरम्यान, पूर्व लदाख येथे झालेल्या लष्करी तणावामुळे भारत-चीन संबंध जवळपास पाच वर्षे थंडावले होते. मात्र २०२४ मध्ये कजान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर संबंध सामान्य करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी व्हिसा आणि उड्डाण सेवा पुन्हा सुरू करण्यासह अनेक पावले उचलली, ज्यामुळे संबंधांमध्ये हळूहळू सुधारणा दिसून येत आहे.

Comments
Add Comment

West Asia War : पश्चिम आशियात तणाव पुन्हा वाढला: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचे बहरीन आणि जॉर्डनमध्ये क्षेपणास्त्र-ड्रोन हल्ले

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणचे सैन्य पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दोन्ही देशांनी पुन्हा एकदा

London Marathi Family Death : लंडनमध्ये मराठी दाम्पत्य आणि मुलाचा मृत्यू; तपासात समोर आली धक्कादायक माहिती

लंडन : ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये (London) एका मराठी कुटुंबाच्या मृत्यूची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भारतीय वंशाचे

POK : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये हिंसा

आंदोलक-सुरक्षा दल संघर्षात ३० ठार, २०० हून अधिक जखमी रावलकोट : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी आंदोलनाला

Oman-Gujarat deep-sea pipeline : होर्मुजची कोंडी फुटणार! ३० वर्षांपासून रखडलेला...'ओमान ते गुजरात' पाईपलाईन प्रकल्प भारत मार्गी लावणार!

सध्या पश्चिम आशिया (Middle East) युद्धाच्या आणि तणावाच्या छायेत आहे. या वाढत्या अस्थिरतेमुळे जगभरात इंधनाच्या संकटाची

H-1B Visa : आता H-1B व्हिसा स्वस्तच! ट्रम्प यांना कोर्टाचा मोठा झटका; १ लाख डॉलर्सचे शुल्क रद्द

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना H-1B व्हिसा (H-1B Visa) धोरणाबाबत मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे.

US Apache Helicopter crashes : होर्मुज सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचं ‘अपाचे’ हेलिकॉप्टर कोसळलं! मध्यपूर्वेत खळबळ; दोन्ही वैमानिकांचे थरारक रेस्क्यू

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. जागतिक व्यापारासाठी अत्यंत