Heat wave in Maharashtra : राज्यात पुढील दोन दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून अनेक भागांत तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअस पार करून काही ठिकाणी चाळीशीकडे झुकताना दिसत आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला असून काही जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.



मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट :


हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या किनारपट्टी भागात ८ आणि ९ मार्च रोजी उष्ण व आर्द्र हवामान राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.



विदर्भात उष्णतेचा कहर :


विदर्भात उष्णतेचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. आज राज्यातील सर्वाधिक तापमान अमरावती येथे ४०.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस तापमान चाळीशी पार जाण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात तापमान सामान्यपेक्षा सुमारे पाच अंशांनी जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.



पुण्यात सरासरीपेक्षा सुमारे दोन अंशांनी तापमान वाढलं :


पुणे शहरातही गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत सरासरीपेक्षा सुमारे दोन अंशांनी जास्त तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले असून येत्या काही दिवसांत ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. सांगली येथे ३७.४, सातारा येथे ३६.१ आणि नाशिक येथे ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.



मराठवाड्यातील तापमानातही लक्षणीय वाढ :


दरम्यान, मराठवाड्यातही तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. परभणी येथे ३८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर धाराशिवमध्ये ३६.२, छत्रपती संभाजीनगर येथे ३७.६, बीड येथे ३६.६ आणि उदगीर येथे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्रातही तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Pune Railway Station : पुणे - रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट

पुणे : पुणे स्थानकाच्या मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये सहा नवीन फलाट होणार आहेत. फलाट क्रमांक ७ ते १२ असे

Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक - कुंभमेळा विषयक विकास कामांची राजेश अग्रवाल यांच्याकडून पाहणी

वेळेत कामे पूर्ण करण्याच्या यंत्रणांना दिल्या सूचना नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर

पाणी तुंबणाऱ्या २२७ पैकी १२० ठिकाणी सोमवारपासून कामे सुरू - पुणे महापौर

पुणे : पावसाने गुरुवारी पुणे शहर अक्षरशः तुंबले, रस्ते पाण्याखाली गेले. घरांत, दुकानात पाणी शिरले आणि एका ज्येष्ठ

सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा कहर

सोलापूर : यंदाच्यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट कहर केला असून, मार्च महिन्यातील पाच दिवस

गरिबांचे रक्त पिणाऱ्या बिल्डरांना सोडणार नाही, प्रसंगी 'ईडी' कडे तपास देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

मुंबई: नाशिकमधील म्हाडा गृहप्रकल्पात गरिबांच्या हक्काची घरे हडपण्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून, यात कितीही

Chhatrapati Sambhajinagar Crime : एन-६ सिडको परिसरात मध्यरात्री गोळीबार; तरुण पुरोहिताने स्वतःच्याच डोक्यात...

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको एन-६ परिसरातील साईनगर येथे काल रात्री उशिरा गोळीबाराची एक थरारक घटना घडली. ३१