Heat wave in Maharashtra : राज्यात पुढील दोन दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून अनेक भागांत तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअस पार करून काही ठिकाणी चाळीशीकडे झुकताना दिसत आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला असून काही जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.



मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट :


हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या किनारपट्टी भागात ८ आणि ९ मार्च रोजी उष्ण व आर्द्र हवामान राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.



विदर्भात उष्णतेचा कहर :


विदर्भात उष्णतेचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. आज राज्यातील सर्वाधिक तापमान अमरावती येथे ४०.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस तापमान चाळीशी पार जाण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात तापमान सामान्यपेक्षा सुमारे पाच अंशांनी जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.



पुण्यात सरासरीपेक्षा सुमारे दोन अंशांनी तापमान वाढलं :


पुणे शहरातही गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत सरासरीपेक्षा सुमारे दोन अंशांनी जास्त तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले असून येत्या काही दिवसांत ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. सांगली येथे ३७.४, सातारा येथे ३६.१ आणि नाशिक येथे ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.



मराठवाड्यातील तापमानातही लक्षणीय वाढ :


दरम्यान, मराठवाड्यातही तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. परभणी येथे ३८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर धाराशिवमध्ये ३६.२, छत्रपती संभाजीनगर येथे ३७.६, बीड येथे ३६.६ आणि उदगीर येथे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्रातही तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Pune Traffic Update: पुणेकरांनो पोलीस भरतीमुळे 'या' भागातील वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर जाण्याआधी...

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई (चालक) पदासाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेतील अत्यंत

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तरतूद

पुणे : पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-लोणी काळभोर मार्ग आणि पुणे ते शिरूर ५३ किमीचा उन्नत

Buldhana News: आईला कॉल करत संपवलं आयुष्य; नेमकं घडलं काय?

बुलढाणा: आईला शेवटचा कॉल करुन तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची बातमी समोर येत आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी

‘शाळा बंद’ धोरणाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान

हायकोर्टाने बजावली शिक्षण विभागास नोटीस अमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९

Iran Israel Conflict Affect In India: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचला, नेमकं काय झालं?

दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून सध्या