Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत वारंवार सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



उंबरठाण परिसरात हादरे


मिळालेल्या माहितीनुसार सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण, निवरापाडा, चुली, राशा आणि गोंडाळविहीर या गावांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांत अनेकदा जमिनीचे हलके धक्के जाणवले. ५ मार्च रोजी रात्री सुमारे ११.५२ वाजता अचानक जमिनीतून मोठे आवाज ऐकू आले आणि काही मिनिटे जमीन हादरली.



पुन्हा एकदा धक्क्यांची नोंद


यानंतर ६ मार्च रोजीदेखील पुन्हा एकदा जमिनीला हलके हादरे बसल्याचे नागरिकांनी सांगितले. वारंवार असे धक्के जाणवत असल्यामुळे परिसरातील लोकांमध्ये चिंता वाढली आहे. लहान मुले आणि वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण पसरले



जमिनीतून गूढ आवाज


राशा गावाजवळील डोंगराळ भागातून विचित्र आवाज येत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्या आवाजानंतर काही मिनिटे जमीन हलते, शिवाय काही घरांच्या भिंतींना तडे ही गेले आहेत.



भूकंपमापन यंत्र बसवण्याची मागणी


या वारंवार होणाऱ्या हादऱ्यांमुळे नागरिकांनी प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. परिसरात तातडीने भूकंपमापन यंत्र बसवून परिस्थितीचा अभ्यास करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सतत जाणवणाऱ्या धक्क्यांमुळे संपूर्ण भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

ऐन उन्हाळ्यात पुण्याला पावसाने झोपडले; आयटी पार्कमध्ये साचला बर्फ

पुणे : ऐन उन्हाळयात भर दुपारी पावसाने पुण्यात हजेरी लावली. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा पाऊस आणि गारपिटीने

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार 'टेक ऑफ'

मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासासाठी १०० टक्के 'व्हिजिएफ' मंजूर; फ्लाय ९१ कंपनीची निवड, प्रति आसन २ हजार ९९१ रुपये

बिकट परिस्थिती, घरची जबाबदारी, अन पोलीस भरतीच स्वप्न; नेमकं भरतीवेळी शरीर थकलं अन्...

पुणे : अनेक होतकरू तरुण सरकारी नोकरीचा पाठलाग करत असतात. नोकरी मिळवून कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढण्याचं स्वप्न

येत्या तीन महिन्यांत 'पीएनजी' साठी अर्ज न केल्यास 'एलपीजी' सिलिंडर बंद

मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा; व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ मुंबई : राज्यातील

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा पणन मंत्री जयकुमार रावल

वाढवणजवळ उभारणार जगातील सर्वोत्तम बाजार व्यवस्था मुंबई : बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून

Pandharpur News : पंढरपुरात पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाखांच्या कारसह ४ किलो गांजा जप्त

पंढरपूर : पंढरपूर शहरात पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. शहराच्या मध्यवर्ती