Pandharpur News : पंढरपुरात पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाखांच्या कारसह ४ किलो गांजा जप्त

पंढरपूर : पंढरपूर शहरात पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सरगम चौक परिसरात एका कारमधून तब्बल ३ किलो ९०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमकी घटना काय?


शहरातील सरगम चौक परिसरातून एक कार अत्यंत भरधाव वेगाने जात असताना पोलिसांच्या नजरेस पडली. संशय आल्याने पोलिसांनी तातडीने या कारचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, सरगम चौकात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे संशयित कारला थांबावे लागले. याचा फायदा घेत पोलिसांनी कारची झडती घेतली असता, त्यात सुमारे ४ किलो गांजा सापडला. ३ किलो ९०० ग्रॅम (किंमत सुमारे ७९ हजार रुपये) गांजा सापडला तर ज्या कारणे घेऊन चाललेले कार ५ लाख किमतीची होती. पोलिसांनी सुमारे ५ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी कारचालक माणिक चौगुले याला ताब्यात घेतले आहे. ही धडक कारवाई पंढरपूर पोलिसांच्या वतीने करण्यात आली असून, "शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध अशीच कडक मोहीम सुरू राहील," अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिली.
Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा