भारत ऐतिहासिक कामगिरी करणार ?

मुंबई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये २००७ पासून आतापर्यंत भारत तीन वेळा फायनलमध्ये धडकला आहे. टीम इंडिया २००७, २०१४ आणि २०२४ मध्ये फायनलमध्ये पोहोचली. यापैकी २००७ आणि २०२४ मध्ये भारताने आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप जिंकला तर २०१४ मध्ये भारत आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकपचा उपविजेता झाला. आता इंग्लंड विरुद्धची सेमी फायनल जिंकल्यास भारतीय संघ चौथ्यांदा आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडकणार आहे.


आतापर्यंत प्रत्येकी दोन वेळा आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या तीन संघांनी केली आहे. कोणत्याही संघाने तिसऱ्यांदा आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी केलेली नाही. यामुळे इंग्लंड विरुद्धची सेमी फायनल जिंकून फायनलमध्ये जात पुढे विश्वविजेता होण्याची संधी भारताकडे आहे. भारत इंग्लंडला हरवून फायनलमध्ये पोहोचला तर आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये तब्बल चार वेळा धडक मारणारा एकमेव संघ अशीही टीम इंडियाची ख्याती होणार आहे. भारत ही ऐतिहासिक कामगिरी करतो की नाही याकडे अनेकांचे लक्ष आहे.




  1. वर्ष २००७ विजेता भारत - उपविजेता पाकिस्तान

  2. वर्ष २००९ विजेता पाकिस्तान - उपविजेता श्रीलंका

  3. वर्ष २०१० विजेता इंग्लंड - उपविजेता ऑस्ट्रेलिया

  4. वर्ष २०१२ विजेता वेस्ट इंडिज - उपविजेता श्रीलंका

  5. वर्ष २०१४ विजेता श्रीलंका - उपविजेता भारत

  6. वर्ष २०१६ विजेता वेस्ट इंडिज - उपविजेता इंग्लंड

  7. वर्ष २०२१ विजेता ऑस्ट्रेलिया - उपविजेता न्यूझीलंड

  8. वर्ष २०२२ विजेता इंग्लंड - उपविजेता पाकिस्तान

  9. वर्ष २०२४ विजेता भारत - उपविजेता दक्षिण आफ्रिका

Comments
Add Comment

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील