Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने ठामपणे फेटाळून लावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए ) हे दावे निराधार आणि बनावट असल्याचे सांगत स्पष्ट केले की त्यामध्ये कोणतीही तथ्यात्मकता नाही.


परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी (४ मार्च) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म “एक्स” वर म्हटले की, “अशा निराधार आणि मनगढंत टिप्पणींपासून दूर राहण्याचा आम्ही सल्ला देतो.” मंत्रालयाने स्पष्ट केले की, भारत कोणत्याही देशाला इराणविरुद्ध लष्करी हल्ल्यांसाठी आपल्या बंदरांचा वापर करण्याची परवानगी देत नाही.



संयम बाळगा; तणाव आणखी वाढू देऊ नका :


यासोबतच भारताने पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. भारताने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे, तणाव आणखी वाढू न देण्याचे आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.



अमेरिकेचा दावा भारताने खोडला :


भारताची ही प्रतिक्रिया अमेरिकेचे माजी सैन्य अधिकारी कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी दिलेल्या एका मुलाखतीनंतर आली. त्यांनी एका अमेरिकन चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, इराणसोबतच्या युद्धादरम्यान अमेरिकेचे अनेक नौदल तळ नष्ट झाले असून आता त्यांना भारत आणि भारतीय बंदरांवर अवलंबून राहावे लागत आहे. मॅकग्रेगर यांनी असे म्हटले होते, “आमचे सर्व बेस नष्ट झाले आहेत, आमची बंदर व्यवस्था देखील उद्ध्वस्त झाली आहे. आता आम्हाला भारत आणि भारतीय बंदरांवर अवलंबून राहावे लागत आहे, जे आदर्श परिस्थिती नाही.”



अनेकांचा मृत्यू :


दरम्यान,आज गुरुवारी हे युद्ध सहाव्या दिवशी पोहोचले असून सध्या तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अहवालानुसार आतापर्यंत इराणमध्ये आतापर्यंत १००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इस्रायलमध्ये सुमारे डझनभर लोक ठार झाल्याची माहिती आहे.


या युद्धाची सुरुवात शनिवारी (२८ फेब्रुवारी) झाली. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हवाई हल्ले केले, ज्यामध्ये ८६ वर्षीय इराणी सर्वोच्च नेता आयातोल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. यानंतर या प्रदेशातील तणाव झपाट्याने वाढला आहे. जवाबी कारवाई म्हणून इराणने इस्रायल आणि खाडी देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.

Comments
Add Comment

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय गीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या