Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने ठामपणे फेटाळून लावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए ) हे दावे निराधार आणि बनावट असल्याचे सांगत स्पष्ट केले की त्यामध्ये कोणतीही तथ्यात्मकता नाही.


परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी (४ मार्च) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म “एक्स” वर म्हटले की, “अशा निराधार आणि मनगढंत टिप्पणींपासून दूर राहण्याचा आम्ही सल्ला देतो.” मंत्रालयाने स्पष्ट केले की, भारत कोणत्याही देशाला इराणविरुद्ध लष्करी हल्ल्यांसाठी आपल्या बंदरांचा वापर करण्याची परवानगी देत नाही.



संयम बाळगा; तणाव आणखी वाढू देऊ नका :


यासोबतच भारताने पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. भारताने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे, तणाव आणखी वाढू न देण्याचे आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.



अमेरिकेचा दावा भारताने खोडला :


भारताची ही प्रतिक्रिया अमेरिकेचे माजी सैन्य अधिकारी कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी दिलेल्या एका मुलाखतीनंतर आली. त्यांनी एका अमेरिकन चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, इराणसोबतच्या युद्धादरम्यान अमेरिकेचे अनेक नौदल तळ नष्ट झाले असून आता त्यांना भारत आणि भारतीय बंदरांवर अवलंबून राहावे लागत आहे. मॅकग्रेगर यांनी असे म्हटले होते, “आमचे सर्व बेस नष्ट झाले आहेत, आमची बंदर व्यवस्था देखील उद्ध्वस्त झाली आहे. आता आम्हाला भारत आणि भारतीय बंदरांवर अवलंबून राहावे लागत आहे, जे आदर्श परिस्थिती नाही.”



अनेकांचा मृत्यू :


दरम्यान,आज गुरुवारी हे युद्ध सहाव्या दिवशी पोहोचले असून सध्या तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अहवालानुसार आतापर्यंत इराणमध्ये आतापर्यंत १००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इस्रायलमध्ये सुमारे डझनभर लोक ठार झाल्याची माहिती आहे.


या युद्धाची सुरुवात शनिवारी (२८ फेब्रुवारी) झाली. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हवाई हल्ले केले, ज्यामध्ये ८६ वर्षीय इराणी सर्वोच्च नेता आयातोल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. यानंतर या प्रदेशातील तणाव झपाट्याने वाढला आहे. जवाबी कारवाई म्हणून इराणने इस्रायल आणि खाडी देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.

Comments
Add Comment

Iranian crude oil : इराणी कच्च्या तेलाचा कार्गो चीनकडे वळवला गेल्याच्या बातम्या तथ्यात्मकदृष्ट्या चुकीच्या, सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इराणी कच्च्या तेलाचा एक कार्गो पेमेंटशी संबंधित अडचणींमुळे गुजरातमधील वाडीनार

Green Sanvi Vessel: ग्रीन सान्वी जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणत असलेला एलपीजी गॅस किती दिवस पुरेल?

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील पुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

बाजारात बनावट आंब्यांचा सुळसुळाट; तब्बल २०० किलो बनावट आंबे जप्त

हैद्राबाद : उन्हाळा सुरु झाला की स्वागत केलं जात ते फळांचा राजा आंब्याचं, कारण वर्षभरातून फक्त उन्हळ्यातच

Air India Airlines : एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची पश्चिम आशियातून ४२ विमानसेवा सुरु होणार

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, टाटाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या पश्चिम

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही