शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा पोहोच रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून या रस्त्याचे काम आता वाढले गेले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या बाधकामाचाही खर्च वाढला गेला आहे. त्यामुळे या रस्त्याचा खर्च सुमारे साडेचार कोटी रुपयांचा खर्च वाढला गेला असून त्यामुळे या पोहोच रस्त्याचा खर्च सुमारे २६ कोटी रुपयांवर जावून पोहोचला आहे.


शीव रेल्वेच्या पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या काम हाती घेण्यात आले असून या पुलाच्या बांधकामाच्या आड येणारे पूलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या रेल्वेवरील पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या रेल्वेवरील पुलाच्या पुनर्बांधणीकरता येणारा खर्च मध्य रेल्वेच्यावतीने करण्यात येत आहे. त्यामुळे पुलाच्या पोहोच रस्त्याचे महापालिका हद्दीतील काम महापालिकेमार्फत करण्यात येत असून या पुलाच्या पोहोच रस्त्याच्या बांधकामासाठी निरज सिमेंट स्ट्रक्चरलस लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे.


या पुलाच्या पोहोच रस्त्याच्या कामांमुळे जाे अडथळा निर्माण झाला आहे, त्यामुळे मूळ बांधकाम पध्दत म्हणजे रिटेनिंग भिंत यामध्ये बदल करण्यात आला आहे. यासाठी पाईल कॅपह टच पाईल अशा पध्दतीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रकल्प खर्चात वाढ होत असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वाढीव प्रकल्प खर्च हा रेल्वेकडून वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाढीव कामांसाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्याच्या पध्तदीनुसार पोहोच रस्त्याच्या कामांसाठी २१.४४ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती. परंतु आता हा खर्च वाढल्यामुळे वििवध करांसह २५.८४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या विभागाकडून या कामांसाठी १३.१४ कोटी रुपये एवढा निध फेब्रुवारी २०२४ रोजी महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे उर्वरीत रक्कम मध्य रेल्वेकडून वसूल करण्यात येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास