T20 World Cup : खेळाडूवर दुःखाचा डोंगर; रिंकू नंतर आणखी एका खेळाडूच्या वडिलांचे निधन

मुंबई : वर्ल्ड कपचा अंतिम सामना जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतशी प्रेक्षकांमध्ये सामन्याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. अशातच क्रिकेटविश्वातून आणखी एक दुःखद वार्ता समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय फलंदाज रिंकू सिंग यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर आता श्रीलंकेचा दिग्गज माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



संगकारांच्या वडिलांचे निधन


मिळालेल्या माहितीनुसार, संगकारांचे वडील क्षेमा संगकारा यांचे ३ मार्च रोजी निधन झाले. ते श्रीलंकेतील कॅंडी येथील कोर्टात प्रसिद्ध वकील होते. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच विश्वचषक स्पर्धेत समालोचनाची जबाबदारी सांभाळत असलेले संगकारा तातडीने मायदेशी रवाना झाले. ४ मार्च रोजी अंत्यसंस्कार पार पडणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.


कुटुंबीयांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांच्या जाण्याने कुटुंब आणि परिचितांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.



रिंकू सिंग यांच्यावरही शोक


याआधी भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज रिंकू सिंग यांचे वडील खानचंद सिंग यांचेही अलीकडेच निधन झाले होते. सुपर ८ फेरीतील सामन्यानंतर ही घटना घडली होती. त्यानंतर रिंकू तातडीने घरी परतला आणि पुढे पुन्हा जोमाने संघात सहभागी झाला.



अंतिम सामन्यापूर्वी परतण्याची शक्यता


दरम्यान, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी संगकारा पुन्हा समालोचन पॅनेलमध्ये दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 : इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी खेळाडूंनी घेतला बाप्पाचा आशीर्वाद

मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेपटूंनी मुंबईतील

Smriti Mandhana : कौतुकास्पद! स्मृती मानधना पुन्हा ठरली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल

आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना एकदिवसीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला.