राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार रिंगणात

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काँग्रेसने या जागेवरील आपला दावा सोडून पवारांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.



गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या या जागेवरून महाविकास आघाडीत खलबते सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी सातत्याने संपर्क साधून ही जागा पवारांसाठी सोडण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार सतेज पाटील यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेतली. या चर्चेनंतर काँग्रेसने शरद पवारांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला.


काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राज्यसभेच्या या जागेवर त्यांचा 'नैसर्गिक दावा' मानला जात होता. मात्र, शरद पवार यांची संसदीय कारकीर्द आणि महाविकास आघाडीतील त्यांचे स्थान लक्षात घेता, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतः पुढाकार घेतला. खर्गे यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना शरद पवारांच्या पाठिशी उभे राहण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतरच महाविकास आघाडीचा हा फॉर्म्युला निश्चित झाला.


या निर्णयाची घोषणा करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "शरद पवार हे महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार असतील. आघाडीतील सर्व घटक पक्ष त्यांना मतदान करतील." दरम्यान, शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता मैदानात असल्याने, सत्ताधाऱ्यांकडून अतिरिक्त उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता कमी असून, ही निवड बिनविरोध होईल, असे बोलले जात आहे.


आजोबा - नातू राज्यसभेत


दुसरीकडे, शरद पवारांचे नातू आणि अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार देखील राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामुळे आजोबा आणि नातू एकत्र राज्यसभेत दिसणार आहेत.

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती