Rajya Sabha : राज्यसभेसाठी भाजपकडून 'सोशल इंजिनिअरिंग'; विनोद तावडे, आठवलेंसह दोन नव्या चेहऱ्यांना संधी

मुंबई : बहुचर्चित राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी उमेदवारांची घोषणा केली असून, नेहमीप्रमाणे यंदाही 'धक्कातंत्रा'चा अवलंब केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले या दिग्गज नेत्यांसोबतच, भाजपने माया ईवनाते आणि रामराव वडकुते या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देऊन सामाजिक समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे.


भाजपने यंदा उमेदवारी देताना राज्यातील महत्त्वाच्या समाजघटकांना प्रतिनिधीत्व दिले आहे. नागपूरच्या माजी महापौर राहिलेल्या माया इवनाते या भाजपचा राज्यातील महत्त्वाचा आदिवासी चेहरा आहेत. त्या अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाच्या सदस्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या निवडीतून भाजपने विदर्भातील आदिवासी मतांचे समीकरण साधले आहे.


धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे रामराव वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. विधान परिषदेचा अनुभव गाठीशी असलेल्या वडकुते यांच्या रूपाने भाजपने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील धनगर समाजाला साद घातली आहे.





विनोद तावडे पुन्हा संसदीय राजकारणात:


पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणारे विनोद तावडे यांना अपेक्षेप्रमाणे राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला आहे. तर, मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रमुख रामदास आठवले यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. राज्यातील विधानसभेच्या सध्याच्या संख्याबळानुसार, राज्यसभेच्या सात जागांपैकी भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. उर्वरित जागांवर शिवसेनेच्या वतीने माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार गुरुवारी अर्ज दाखल करतील.



महाविकास आघाडीची कोंडी?


दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे असलेल्या संख्याबळानुसार त्यांची केवळ एक जागा निवडून येऊ शकते. मात्र, या जागेवर शरद पवार गट, काँग्रेस की उबाठा गट आपला उमेदवार देणार, याबाबत अद्याप एकमत झालेले नाही. दरम्यान, भाजपने आपल्या उमेदवारांच्या माध्यमातून मराठा, दलित, आदिवासी आणि धनगर अशा सर्वच समाजघटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केल्याने, ही निवडणूक केवळ औपचारिकता उरते की काही वेगळे वळण घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Comments
Add Comment

BMC चे पाणीकपातीनंतर बुस्टर पंपांवर कारवाईचे निर्देश

घोषणा झाल्यापासून झोपलेले महापालिका अतिरिक्त आयुक्त आता झाले जागे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळापूर्व

BMC ने मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांसाठी सुरू केली कूलिंग ट्रीटमेंट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : अतिउष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी होतो आणि झाडांवर ताण वाढतो. परिणामी, झाडांची मुळे

Accident : मिसिंग लिंकवर तीन तासांत दोन अपघात, मुंबई - पुणे वाहतूक विस्कळीत

पुणे : मुंबई ते पुणे प्रवास हा प्रवास वेगाने करण्यासाठी मिसिंग लिंक सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे प्रवास

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी सूत्रधाराला पुण्यातून अटक

पुणे : नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने पुण्यातून रसायनशास्त्राचा निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी

मान्सून २६ मे पर्यंत केरळमध्ये आणि ६ जून पर्यंत कोकणात ?

नवी दिल्ली : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD)

पश्चिम रेल्वेचा रात्रकालीन ५ तासांचा ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीच्या दरम्यान, दादर स्थानकात ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक इलेक्ट्रॉनिक