BMC News : मुंबईतील १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी होणार अर्ज सादर

प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड


भाजपच्या करिष्म्याकडे सर्वांचे लक्ष


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता महापालिकेच्या वैधानिक समित्या असलेल्या १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी ०४ मार्च रोजी उमेदवारी अर्ज सादर केले जाणार आहेत. तर या सर्व प्रभाग समित्यांच्या निवडणूका तीन टप्प्यात म्हणजे गुरुवारी, शुक्रवारी आणि येत्या सोमवारी होणार आहेत. या तिन्ही टप्प्यातील निवडणुकांमध्ये महापौर आणि उपमहापौर हे पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज सांभाळणार आहे. एक ते दोन प्रभाग समिती वगळता उर्वरीत सर्व ठिकाणी बिनविरोधच निवडणूक प्रक्रिया पार पडली जाण्याची शक्यता आहे


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ८९ तर तर शिवसेनेचे २९ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. तर उबाठाचे ६५, मनसेचे ०६ आणि काँग्रेसचे २४ तसेच एमआयएमचे ०८ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक अशाप्रकारे नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळाल्यामुळे एल प्रभाग समिती अध्यक्षपद हे महायुतीकडे आता येणार आहे. त्यामुळे महायुतीकडे १७ पैंकी ०९ प्रभाग समिती जाणार असून उबाठा मनसे युतीकडे काँग्रेसच्या पाठिंब्यावर सहा प्रभाग समिती राखल्या जाणार आहेत. तर एकमेव एस अँड टी प्रभाग समितीमध्ये महायुतीचे दहा तर उबाठा, काँग्रेस आणि मनसे यांचे दहा असल्यामुळे समसमान सदस्य संख्या आहे. त्यामुळे याठिकाणी जर काँग्रेस किंवा मनसे तटस्थ राहिल्यास भाजपच्या पारड्यात ही समिती पडेल, अन्यथा समसमान सदस्य संख्या असल्यामुळे ईश्वर चिठ्ठीद्वारे या प्रभाग समितीचा अध्यक्ष ठरला जाईल.


मुंबई महापालिकेत सन २०१७मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार मुंबईत उबाठाच्या हाती आठ प्रभाग समित्या होत्या. त्यातील दोन प्रभाग समित्या आता उबाठाला गमवण्याची वेळ आली आहे. तर भाजपने पहारेकऱ्यांची भूमिका बजावली असली तरी त्यांच्याकडे ०९ प्रभाग समित्या होत्या. परंतु यावेळी ८९ नगरसेवक निवडून आल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने ०९ प्रभाग समित्या महायुतीकडे जावू शकतात.


महाविकास आघाडीकडे जाणाऱ्या सहा पैंकी दोन प्रभाग समित्यांमध्ये काँग्रेसचे जास्त बळ असल्याने उबाठा आणि मनसे तसेच समाजवादी पक्षाच्यावतीने दोन प्रभाग समित्यांवर वर्चस्व असेल. त्यामुळे उबाठाला आपल्या बळावर केवळ चार प्रभाग समिती राखता येणार आहे.


आधी प्रभाग समिती, मग विशेष समित्यांच्या निवडणुका


विशेष म्हणजे सहा विशेष समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक घेतली जायची, तिथे यंदा प्रभाग समिती अध्यक्षपदाची प्रथम आणि त्यानंतर विशेष समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आखला गेला आहे.


येत्या गुरुवारी ०५ मार्च रोजी होणाऱ्या प्रभाग समिती :


सी अँड डी, ए,बी अँड ई, एफ दक्षिण व एफ उत्तर, आर उत्तर व आर मध्य, आर दक्षिण, पी पूर्व व पी पश्चिम


येत्या शुक्रवारी ०६ मार्च रोजी होणाऱ्या प्रभाग समिती


जी उत्तर, जी दक्षिण, पी दक्षिण, के पश्चिम, के उत्तर व के दक्षिण,


येत्या सोमवारी ०९ मार्च रोजी होणाऱ्या प्रभाग समिती


एल, एन, एस अँड टी, एम पश्चिम, एम पूर्व


महायुतीकडे राखल्या जाणाऱ्या संभाव्य प्रभाग समित्या : ०९


सी आणि डी, , के पश्चिम, पी दक्षिण, आर दक्षिण, आर उत्तर व आर मध्य, एम पश्चिम, एन विभाग, के उत्तर व के दक्षिण,एल


उबाठा, मनसे, काँग्रेस, सपाकडे या राहतील संभाव्य प्रभाग समित्या: ०६


ए,बी आणि ई, एफ दक्षिण व एफ उत्तर , जी दक्षिण, जी उत्तर, एच पूर्व व एच पश्चिम, पी पूर्व व पी पश्चिम


एमआयएमच्या वाट्याला येणारी प्रभाग समिती : ०१


एम पूर्व प्रभाग


ईश्वर चिठ्ठीने काढली जाणारी प्रभाग समिती :०१


एस अँड टी प्रभाग

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित