मुंबईत भर रस्त्यात पतीने केली पत्नीची हत्या

मुंबई : अंधेरी पूर्व भागातील सागबाग रोडवरील आराध्या रुग्णालयासमोर शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी साडेचार वाजता एक धक्कादायक घटना घडली. राजेश एकनाथ छत्रे या ४६ वर्षीय व्यक्तीने कौटुंबिक वादातून पत्नी पंचभिला राजेश छत्रे या ३८ वर्षीय महिलेची भर रस्त्यात हत्या केली. पतीने पत्नीवर चाकूने घातक वार केले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या पंचभिला राजेश छत्रे यांचा थोड्याच वेळात मृत्यू झाला.


या प्रकरणात अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी राजेश एकनाथ छत्रे याला अटक केली आहे. भर रस्त्यात हत्या झाल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते पण आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.


हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही फूटेज तसेच फॉरेन्सिकच्या दृष्टीने महत्त्वाचे नमुने आणि पुरावे यांचे संकलन केले आहे. गुन्ह्यात वापरलेला चाकू पण जप्त करण्यात आला आहे. पंचभिला यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. एमआयडीसी पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम ३७(१)(अ) आणि १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित मुलींना मोठा दिलासा

लातूर : राज्य सरकारने सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता राज्य सरकारी

सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली उघड; कर्मचारीच....

मुंबई : प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात चोरीची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

राज्यातील हॉटेल, ढाबे,उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी महत्वाची अपडेट

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील

अचानक मोबाईलचं नेटवर्क गायब झाल्यास 'या' गोष्टी करा

सध्याच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आजच्या काळात एकमेकांशी संपर्क

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं.