Census : जनगणना २०२६ च्या कार्यक्रमाची जबाबदारी अभियंत्यांच्या खांद्यावर?

अत्यावश्यक कामे पुरी करायची की जनगणना?, अभियंत्यांकडून केला जात आहे सवाल


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आगामी भारतीय जनगणना २०२६ च्या कार्यक्रमासाठी मुंबईत जनगणनेला सुरुवात झाली असून यासाठी महानगरपालिकेतील अभियंता संवर्गातील अधिकाऱ्यांवरही जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. एका बाजुला पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, रस्ते, मलनि:सारण वाहिन्या, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, घनकचरा व्यवस्था आदींचे काम प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक असतानाच अशाप्रकारच्या जनगणनेच्या कामांसाठी महापालिका अभियंत्यांना जुंपवले जात असल्याने अभियंत्यांच्या संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनच्यावतीने महापालिका आयुक्त आश्विनी भिडे ०८ एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये इंजिनिअर्स असोशिएशनने असे नमुद केले आहे की, मुळातच महापालिकेतील अभियंत्यांची मोठ्या प्रमामावर पदे गेली अनेक वर्षे रिक्त आहेत. सध्या जवळपास १८० कार्यकारी अभियंत्यांची पदे रिक्त असून, त्याचप्रमाणे इतर अभियंता पदांमध्येही मोठ्या प्रमाणात तूट आहे. उपलब्ध मनुष्यबळावरच संपूर्ण मुंबई शहरातील विकासकामे, पायाभूत सुविधा, तसेच दैनंदिन देखभाल यांचा मोठा ताण आहे.


अलिकडेच महापालिका निवडणुकांमुळे काही काळ विकासकामांमध्ये खंड पडला होता. सध्या उपलब्ध अभियंते प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याशिवाय, येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई, गटार सफाई, रस्ते दुरुस्ती, जल वितरण, मलनिःसारण व्यवस्था, घन कचरा व्यवस्थापन आदी अत्यंत महत्त्वाच्या कामांची जबाबदारीही अभियंत्यांवर आहे. ही सर्व कामे वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.


पण अशा परिस्थितीत, जनगणनेसारख्या मोठ्या आणि वेळखाऊ प्रक्रियेसाठी अभियंत्यांची नियुक्ती करणे हे प्रशासनिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही, तसेच त्यामुळे शहराच्या अत्यावश्यक विकासकामांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे,असल्याचे सांगत भीती वर्तवली आहे.


असोशिएशनचे कार्याध्यक्ष रमेश भूतेकर-देशमुख यांनी या निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करत, भारतीय जनगणना २०२६ च्या कार्यक्रमातून महापालिका अभियंता संवर्गास पूर्णतः वगळण्यात यावे, जेणेकरून ते आपली मूलभूत जबाबदारी प्रभावीपणे पार पाडू शकेल,असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण