Census : जनगणना २०२६ च्या कार्यक्रमाची जबाबदारी अभियंत्यांच्या खांद्यावर?

अत्यावश्यक कामे पुरी करायची की जनगणना?, अभियंत्यांकडून केला जात आहे सवाल


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आगामी भारतीय जनगणना २०२६ च्या कार्यक्रमासाठी मुंबईत जनगणनेला सुरुवात झाली असून यासाठी महानगरपालिकेतील अभियंता संवर्गातील अधिकाऱ्यांवरही जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. एका बाजुला पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, रस्ते, मलनि:सारण वाहिन्या, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, घनकचरा व्यवस्था आदींचे काम प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक असतानाच अशाप्रकारच्या जनगणनेच्या कामांसाठी महापालिका अभियंत्यांना जुंपवले जात असल्याने अभियंत्यांच्या संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनच्यावतीने महापालिका आयुक्त आश्विनी भिडे ०८ एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये इंजिनिअर्स असोशिएशनने असे नमुद केले आहे की, मुळातच महापालिकेतील अभियंत्यांची मोठ्या प्रमामावर पदे गेली अनेक वर्षे रिक्त आहेत. सध्या जवळपास १८० कार्यकारी अभियंत्यांची पदे रिक्त असून, त्याचप्रमाणे इतर अभियंता पदांमध्येही मोठ्या प्रमाणात तूट आहे. उपलब्ध मनुष्यबळावरच संपूर्ण मुंबई शहरातील विकासकामे, पायाभूत सुविधा, तसेच दैनंदिन देखभाल यांचा मोठा ताण आहे.


अलिकडेच महापालिका निवडणुकांमुळे काही काळ विकासकामांमध्ये खंड पडला होता. सध्या उपलब्ध अभियंते प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याशिवाय, येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई, गटार सफाई, रस्ते दुरुस्ती, जल वितरण, मलनिःसारण व्यवस्था, घन कचरा व्यवस्थापन आदी अत्यंत महत्त्वाच्या कामांची जबाबदारीही अभियंत्यांवर आहे. ही सर्व कामे वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.


पण अशा परिस्थितीत, जनगणनेसारख्या मोठ्या आणि वेळखाऊ प्रक्रियेसाठी अभियंत्यांची नियुक्ती करणे हे प्रशासनिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही, तसेच त्यामुळे शहराच्या अत्यावश्यक विकासकामांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे,असल्याचे सांगत भीती वर्तवली आहे.


असोशिएशनचे कार्याध्यक्ष रमेश भूतेकर-देशमुख यांनी या निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करत, भारतीय जनगणना २०२६ च्या कार्यक्रमातून महापालिका अभियंता संवर्गास पूर्णतः वगळण्यात यावे, जेणेकरून ते आपली मूलभूत जबाबदारी प्रभावीपणे पार पाडू शकेल,असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

BMC News : तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावावरून सलग दुसऱ्यांदा महापौरांकडून चूक

सत्ताधारी पक्ष दुसऱ्यांदा आला अडचणीत घाटकोपरमधील रस्ता रेषेसंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्याची महापौरांना

Chembur Tree Collapse : चेंबूरच्या झाड दुर्घटनेच्या अहवाल सत्ताधाऱ्यांनाच अमान्य

अहवालाची फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश सभागृहनेत्यांनी अहवालाची प्रतच सभागृहात फाडत

FDA : मुंबईच्या प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; परवाना निलंबित

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' (Safe Food, Safe Maharashtra) या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

NEET-UG 2026 Result : नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर; परीक्षेत मुलींनी मारली बाजी

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) ने नीट-यूजी (NEET-UG) २०२६ परीक्षेचा निकाल (Result) जाहीर केला आहे. उत्तरतालिका (Answer

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत