खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात हाय अलर्ट, जम्मू काश्मीरमध्ये बंदोबस्तात वाढ

नवी दिल्ली : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आणि भारतात हाय अलर्ट जाहीर झाला आहे. जम्मू काश्मीरमध्ये बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. अयातुल्ला अली खामेनी हे शिया मुसलमानांचे धर्मगुरु होते. जगातील अनेक देशांतले आणि प्रामुख्याने भारतातले शिया मुसलमान त्यांचा धर्मगुरु म्हणून आदर करत होते. या पार्श्वभूमीवर अमेरिका - इस्रायलच्या हवाई हल्ल्यात खामेनींचा मृत्यू झाल्यानंतर भारतासह अनेक देशांमध्ये ठिकठिकाणी शिया मुसलमानांच्यावतीने अमेरिका आणि इस्रायल यांचा निषेध करण्यासाठी आंदोलनं करण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत हाय अलर्ट देण्यात आला आहे तसेच काही ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.


आंतरराष्ट्रीय घडामोडींचा भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो यामुळे देशांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व सुरक्षा यंत्रणांना केंद्रीय गृहमंत्रालयाने हाय अलर्ट दिला आहे. इराण समर्थक आणि इराण विरोधी गटांच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आणि इराणी, अमेरिकन आणि इस्रायली दूतावास आणि वाणिज्य दूतावासांभोवती सुरक्षा मजबूत करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.


केंद्रीय गृह मंत्रालयाने शिया मिलिशिया तसेच इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा सारख्या दहशतवादी संघटनांकडून निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांकडेही लक्ष वेधले आहे. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीवरून असे दिसून येते की दहशतवादी गट अशांतता निर्माण करण्यासाठी या तणावपूर्ण वातावरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


दूतावास, प्रमुख पर्यटन स्थळे, ज्यू संस्था आणि पाश्चात्य-संलग्न आस्थापनांना संभाव्य लक्ष्य म्हणून सूचीबद्ध केले आहे. केंद्र सरकारने राज्यांना मोक्याच्या आणि संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गर्दीच्या तसेच संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यास सांगितले आहे. तसेच संशयास्पद ठिकाणी तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर

धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा