चेंबूरमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून मजूर पडल्याने महापौरांनी दिले कडक कारवाईचे आदेश

मुंबई: चेंबूर येथील सुभाष नगर परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सहा मजूर पडले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर अन्य पाच जण जखमी झाले. दरम्यान शनिवारी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी घडलेल्या या दुर्घटना स्थळी महापौर रितू तावडे यांनी तातडीने भेट दिली. तसेच घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात जाऊन जखमी मजुरांची विचारपूसही त्यांनी केली.


आदित्य राज या विकासकामार्फत इमारत बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीत सातव्या मजल्याचे काम सुरू असताना परांची कोसळून ही दुर्घटना घडली. या अपघातात सहा जण खाली कोसळले. त्यापैकी एका मजुराचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तर अन्य पाच जणांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मजूर नेमके कसे कोसळले, याची माहिती घेतली असता या बांधकाम स्थळी अतिशय निष्काळजीपणा करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. अशा प्रकारचा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. कायद्याअंतर्गत कामगारांना सर्व प्रकारच्या सुरक्षा साधनांचा अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच कार्यस्थळावर अभियंता वर्गाच्या देखरेखीखाली काम होणे आवश्यक आहे. अपघात झाला, तेव्हा अभियंता कुठे होता? यासह विविध बाबी तपासणी गरजेचे आहे, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.


या दुर्घटनेबाबत प्राथमिक माहिती घेतली आहे. त्यानुसार, बेजबाबदारपणे काम करणाऱ्या विकासक आणि कंत्राटदार यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच अशा घटना भविष्यात होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिका व म्हाडा प्राधिकरणाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही निर्देशही महापौर रितू तावडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.


या घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी महापौर रितू तावडे या राजावाडी रुग्णालयात पोहचल्या. उपचार सुरू असलेलया पाच पैकी एका मजुराची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. जखमी सर्व रुग्णांवर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत, असे महापौरांनी नमूद केले. यावेळी उप महापौर संजय घाडी आणि विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर हे उपस्थित होते.

Comments
Add Comment

अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित मुलींना मोठा दिलासा

लातूर : राज्य सरकारने सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता राज्य सरकारी

सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली उघड; कर्मचारीच....

मुंबई : प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात चोरीची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

राज्यातील हॉटेल, ढाबे,उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी महत्वाची अपडेट

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील

अचानक मोबाईलचं नेटवर्क गायब झाल्यास 'या' गोष्टी करा

सध्याच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आजच्या काळात एकमेकांशी संपर्क

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं.