इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू; मुलगी-जावयासह कुटुंबातील अनेकांचा अंत

तेहरान : इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. इराणी सरकारी माध्यमांनी खामेनी यांच्या निधनाची पुष्टी केली असून, त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्यांसह त्यांच्या मुलगी आणि जावईंचा देखील मृत्यू झाला आहे. इराण सरकारने ४० दिवसांचा सार्वजनिक शोक जाहीर केला आहे आणि ७ दिवसांची सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे.


इराणी सरकारी दूरचित्रवाणी आणि अधिकृत वृत्तसंस्था आयआरएनएने ८६ वर्षीय खामेनी यांच्या निधनाची माहिती दिली, परंतु मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांपूर्वी सांगितले की खामेनी यांचा मृत्यू अमेरिका-इस्रायली संयुक्त कारवाईत झाला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने या हल्ल्यात मारल्या गेलेल्या सात वरिष्ठ इराणी संरक्षण नेत्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अली शामखानी, मोहम्मद पाकपौर, सालेह असादी, मोहम्मद शिराजी, अझीझ नासिरजादेह, हुसेन जबल अमेलियन आणि रेझा मुझफ्फर-निया यांचा समावेश आहे.


खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये शोकाची लाट पसरली आहे. इराणी माध्यमांनी म्हटले की, "देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे निधन झाले आहे." त्यांच्या निधनामुळे देशभर ४० दिवसांचा सार्वजनिक शोक जाहीर केला गेला आहे. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, "इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक असलेल्या खामेनीचा मृत्यू झाला आहे. irans-supreme-leader-khamenei हा न्याय फक्त इराणच्या लोकांसाठी नाही, तर खामेनी आणि त्याच्या रक्तपिपासू टोळीने मारलेल्या किंवा त्रास दिलेल्या सर्व लोकांसाठी आहे."


इस्त्रायल-इराण संघर्षावर भारताची बारीक नजर; दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद


तेहरान, अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाचे रूपांतर आता हिंसक संघर्षात झाले आहे. रविवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि इतर उच्चपदस्थ नेतृत्व अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेले आहेत, या दाव्याला इराणी माध्यमांनी दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर जगभरातील शिया मुस्लिमांनी अमेरिकेच्या हल्ल्यांवर टीका केली आणि त्यांना अति हिंसक म्हटले.


भारताने या तणावावर तात्काळ प्रतिक्रिया व्यक्त केली आणि सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आणि तणाव वाढू नये असे आवाहन केले. भारताने एक निवेदन जारी केले ज्यामध्ये म्हटले आहे की सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे. शिवाय, भारताने शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय राजनैतिकतेला चालना देण्याची गरज आहे. भारताने वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्याची आणि युद्ध टाळण्याची विनंती केली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की इराण आणि आखाती प्रदेशातील अलिकडच्या घडामोडींबद्दल भारत चिंतित आहे. मंत्रालयाने सर्व देशांना संयम बाळगण्याचे तसेच चर्चेतून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Modi : सध्याचे दशक अनिश्चितता, जागतिक संकटाचे

नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान द हेग येथे भारतीय समुदायाला

Who Was Abu-Bilal al-Minuki ? कोण होता आफ्रिकेत लपलेला ISIS चा जागतिक डेप्युटी कमांडर अबू-बिलाल अल-मिनुकी ? ज्याला अमेरिकेने उडवले!

वाशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जागतिक दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एका मोठ्या

Donald Trump : ISIS चा जागतिक उपप्रमुख अबू-बिलाल अल-मिनुकीचा खात्मा; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे. जागतिक

India - UAE : भारत आणि UAE यांच्यात सात करारांवर सहमती

अबुधाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूएई दौऱ्यादरम्यान ७ महत्त्वाच्या विषयांवर सहमती झाली आहे. दोन्ही

Balen Shah : बालेन शाहाचा भारताला मोठा झटका, थेट...

Balen Shah : बालेन शाह हे नेपाळचे पंतप्रधान आहे. जेनझीने आंदोलन करत नेपाळचे आधीचे सरकार उलथवून लावले होते. त्यानंतर

Marathi Actor Cannes Look : कान्सच्या रेड कार्पेटवर मराठमोळा जलवा! पुष्कर जोगचा डॅशिंग लूक चर्चेत

फ्रान्स : सध्या जगभरात ७९ व्या कान्स फिल्म फेस्टिवलची जोरदार चर्चा सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूड आणि