नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

मुंबई: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. व्यंकट बापुराव धुमाळे, शेळगाव येथील काँग्रेसचे विधी उपाध्यक्ष ॲड अशोक गंगाराम कापसे, काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. मिलिंद शिकारे यांच्यासह त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात तळागाळात शिवसेना पोहोचल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.


यावेळी त्यांच्यासह मरखेलचे प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक रेड्डी, व्यंकट पाटील, धनाजी पाटील, गंगाधर लोणे, सरपंच आनंद राजुरे, पवन भुताळे, विठ्ठल सुनसर, गजानन पाटील, विजय पाटील, शिवराज पाटील, अर्जुन गायकवाड, सुरेश मुंडकर, गौतम वाघमारे असे सात सरपंच तर बळीराम बेगडे आणि पांडुरंग वाघमारे हे माजी सरपंच तसेच असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी बोलताना शिंदे यांनी गेल्या साडेतीन वर्षात राज्यातील महायुतीच्या वतीने नांदेड जिल्ह्यात अनेक विकासकामे करण्यात आली. त्यामुळंच तळागाळातील लोकांना शिवसेना ही आपली वाटू लागली आहे. त्यामुळेच पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चांदा ते बांदा शिवसेनेचा विस्तार होत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तसेच नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार चांगल्या पद्धतीने होत असून दिवसेंदिवस पक्ष अधिक मजबूत होत असल्याचे सांगितले. तसेच आज पक्षप्रवेश केलेल्या सर्वांनी पक्ष अधिक मजबुत करण्यासाठी कामाला लागावे अशी अपेक्षा व्यक्त केली.


यावेळी बालाजी पाटील खतगावकर, भद्रावती वरोरा जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे आणि शिवसेनेचे नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

Comments
Add Comment

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी; मुख्यमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात

दातृत्वाचा धनी हरपला! दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे

काळाराम मंदिरात सामुहिक रामरक्षा पठण

नाशिक : नाशिकच्या श्री काळाराम संस्थानतर्फे सुरू असलेल्या वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ मध्ये रविवारची सकाळ

नाशिक - जिल्हाधिका-यांनी घेतला सप्तशृंग गड येथे तयारीचा आढावा

नाशिक : वणी गडावरील चैत्र यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी सप्तशृंग गड

कोल्हापूरचा धान्य महोत्सव; ‘मिलेट रॅली’ ला उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कृषी विभागाच्या

‘विकसित भारता’च्या दिशेने वाटचाल करताना ‘स्वस्थ भारत’ घडवणेही तितकेच महत्त्वाचे - उपराष्ट्रपती

- उरुळी कांचन, पुणे येथे निसर्गोपचार आश्रम ८१ वा वर्धापनदिन पुणे : आजच्या वेगवान जीवनशैलीत लोक अनेकदा भौतिक