Appreciating Swadeshi : स्वदेशी सल्लागार कंपन्यांचे साह्य घेणारा कौशल्य विकास विभाग राज्यात प्रथम

स्वदेशीचा पुरस्कार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार


मुंबई : राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात भारतीय सल्लागार कंपन्यांना नेमण्याचे धोरण आखले असून यासंदर्भात शासन निर्णय जारी झाला आहे. या निर्णयाची राज्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाद्वारे सर्वात आधी अंमलबजावणी होत आहे. यासंदर्भात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या देशी सल्लागार कंपनी यांच्या सल्लागार यांच्या सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत कौशल्य विकास विभागाला पत्र ही लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य असून कौशल्य विभाग याची पहिल्यांदा अंमलबजावणी करत असल्याचा आनंद असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.


क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त कौशल्य विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यभरातील आदिवासी आणि दुर्गम भागात नियम शिथिल करून ३०० चौरस फूट जागेत महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य विकास केंद्र औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग शासनाने समाविष्ट केलेल्या भारतीय सल्लागार कंपन्यांची सेवा घेणार आहे.


महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य विकास केंद्र चालविण्यासाठी सल्लागार यांच्या सेवा उपलब्ध करून देण्याचे काम सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, छत्रपती संभाजीनगर, सेंटर ऑफ पॉलिसी रिसर्च अँड गव्हर्नन्स, मुंबई, सेवा सहयोग फाऊंडेशन, पुणे आणि मुंबई येथील विवेक व्यासपीठ, मुंबई या सूचिबद्ध(एम्पॅनलमेंट)संस्थांना देण्यात यावे अशी सूचना कौशल्य विभागाला या पत्रात करण्यात आली आहे.


मंत्री लोढा यांनी सांगितले की, देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवं भारताच्या संकल्पनेत स्वदेशीला विशेष महत्व दिले आहे. त्यामुळेच मेक इन इंडिया मुळे भारतीय उद्योजकांचा आत्मविश्वास वाढला असून भारतीय दर्जेदार उत्पादने जगभरात लोकप्रिय होत आहेत. हाच स्वदेशीचा नारा आता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अमलात आणला आहे. विदेशी सल्लागार कंपन्या ऐवजी आता प्रशासनाच्या सहकार्यासाठी भारतीय सृजनशील तरुण पुढे येणार आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेचा खऱ्या अर्थाने सन्मान होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने भारतीय तरुणांच्या संशोधनात भारतीयत्वाची सांगड दिसून येणार असून स्वदेशी सल्लागार कंपन्या जगभरात भरारी घेण्यासाठी सज्ज होणार आहेत.

Comments
Add Comment

World's Most Expensive Mango : जळगावातील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पिकवला जगातील महागडा आंबा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अनेक वर्षे पोलीस सेवेत कार्यरत राहून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून

Monsoon 2026 : अखेर तारीख ठरली! 'या' तारखेपासून महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात सध्या प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात २ पोलीस अधिकारी तर १ कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्याचे (Bodwad Police Station) दोन अधिकारी व एका पोलीस कर्मचाऱ्यावर तडकाफडकी निलंबनाची

Pune Metro News : पुणेकरांनो लक्ष द्या! मेट्रो कामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल; कात्रजमधील पीएमपी बसथांबा हलवला

पुणे : पुणे शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक जलद, सुरक्षित

CM Devendra Fadnavis : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; 'मुंबई टेक वीक'ची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक

Accident News: कपडे खरेदीसाठी निघाले अन् वाटेतच घात झाला ! पती, पत्नीसह चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

वर्धा : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Nagpur-Hyderabad National Highway) हिंगणघाट नजीक आज  भीषण अपघात घडला आहे.