Why is Sharad Pawar silent on 'Urban Naxalites' : वारकरी संप्रदायातील 'अर्बन नक्षलवाद्यां'वर शरद पवार गप्प का?

नवनाथ बन यांचा सवाल; लव्ह जिहाद, लांगुलचालनावरून विरोधकांवर टीका


मुंबई : "वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची घुसखोरी झाल्याची चिंता व्यक्त करणाऱ्या शरद पवार यांनी, याच संप्रदायात शिरकाव केलेल्या 'अर्बन नक्षलवाद्यां'वरही कधीतरी बोलावे. या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी पवारांकडे काय योजना आहे आणि त्यांची संख्या किती, हे त्यांनी एकदा महाराष्ट्रासमोर स्पष्ट करावे," असे आव्हान भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी दिले. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


शरद पवार यांच्या विधानाचा समाचार घेताना बन म्हणाले की, "वारकरी संप्रदाय हा प्रबोधन करणारा आणि भागवत धर्माची पताका उंचावणारा संप्रदाय आहे. या संप्रदायात धर्मांध शक्ती नाहीत. खरं तर औरंगजेब आणि अफजल खानाची वंशावळ हीच खरी धर्मांध शक्ती आहे. महाराष्ट्रात सध्या लव्ह जिहाद, व्होट जिहाद आणि लँड जिहादचे संकट उभे ठाकले असताना ज्येष्ठ नेते असूनही पवार यावर का बोलत नाहीत?"


काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना बन म्हणाले, "राहुल गांधी हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत असे वाटत असल्यानेच वडेट्टीवार अफजल खानाच्या दाढ्या कुरवळण्याचे काम करत आहेत. खरात याने केलेल्या कृत्याबद्दल कारवाई करण्याची हिंमत काँग्रेस सरकारमध्ये झाली नसती. राज्यात महायुतीचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, म्हणूनच तत्काळ कारवाई झाली," असा दावा त्यांनी केला.



मुंबई महापालिकेत 'एआय'चा पहारा


मुंबई महापालिकेच्या कारभारावर भाष्य करताना त्यांनी नालेसफाईतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. "महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही 'मुंबईकरांचे पहारेकरी' म्हणून काम करत आहोत. नालेसफाईतील घोटाळे रोखण्यासाठी आगामी काळात आवश्यक तिथे 'एआय' (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर महायुतीचा भर असेल," असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Crime News: धक्कादायक! लग्नात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या; शिक्षकासह वडील आणि मामा अटकेत

दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील

Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्रात निसर्गाचा लहरी खेळ! कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट; मान्सून कधी येणार?

केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे ६ जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर

Bhimashankar Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल पाच ते सहा

Wari 2026: लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

मुंबई दि. १३ जून : पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराला सुवर्णवैभव! अधिक मासात भाविकाकडून १.५ किलो सोन्याचा कळस दान

कोल्हापूर : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला (Kolhapur Ambabai Temple) नव्या सुवर्णवैभवाची भर पडली आहे.

Mumbai-Goa Highway : प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबई-गोवा महामार्गावर मोठा दिलासा! संगमेश्वर, पाली आणि लांजा येथील ३ महत्त्वाचे पूल लवकरच सुरू

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून