मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासूनच म्हणजेच नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निकालांत भाजपने मुसंडी मारत 'नंबर १' चे स्थान पटकावले. केवळ नगरपालिकाच नव्हे, तर राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीतही भाजपने आपला गड राखला असून, येथे महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या संपूर्ण निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. महानगरपालिका असो वा जिल्हा परिषदेच्या निवडणुका, भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीने एकत्रितपणे विरोधकांना चारी मुंड्या चीत केले. जिल्हा परिषदांच्या निकालांनी ग्रामीण भागातही महायुतीची पकड मजबूत असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अनेक दिग्गजांनी आणि स्थानिक नेत्यांनी आपला मूळ पक्ष सोडून सत्ताधारी गटात प्रवेश केला. या पक्षांतराचा सर्वाधिक फटका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला बसल्याचे दिसून आले. अनेक बालेकिल्ल्यांमध्ये संघटनात्मक खिंडार पडल्याने ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळवता आले नाही, परिणामी महाविकास आघाडीच्या पदरी निराशा पडली.
मुंबई : दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम आता अंतिम ...
डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाला खिंडार
निवडणुकांचे निकाल लागून काही काळ उलटत नाही तोच, डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यातच भगवे वादळ निर्माण करत अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे डोंबिवलीत ठाकरे गटाची संघटनात्मक बांधणी पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे. यामध्ये केवळ सामान्य कार्यकर्तेच नव्हे, तर पक्षाचे कणा मानले जाणारे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि अनेक शाखा प्रमुखांनी सामूहिकरीत्या शिंदे गटात प्रवेश केला. विधानसभेतील महाविकास आघाडीच्या पराभवानंतर डोंबिवलीत ठाकरे गटाला बसलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यभरात शिवसेना ठाकरे गटातून गळती सुरूच आहे. अनेक निष्ठावान नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गट किंवा भाजपची वाट धरली आहे. डोंबिवलीतील या घडामोडींमुळे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली संघटना वाचवण्याचे आणि हे पक्षांतर रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सतत सुरू असलेली ही पडझड आगामी काळात पक्षासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.