ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध


ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक परिसराचा कायापालट करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. स्टेशन एरिया डेव्हलपमेन्ट अलाँग द मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडोअर (स्मार्ट) अंतर्गत ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक परिसराचा विकास करणार आहे.


यासाठी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्था (जायका) यांच्या मदतीने यासाठी एमएमआरडीएकडून विकास आराखडा तयार केला जाणार आहे. स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत स्थानक परिसरात प्रवाशांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.


मुंबई – अहमदाबाद अंतर केवळ दोन ते अडीच तासात पार करता यावे यासाठी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात अंदाजे ५०८ किमीच्या या मार्गात एकूण १२ स्थानकांचा समावेश आहे. यात बीकेसी, ठाणे, विरार आणि पालघर ही चार स्थानके आहेत.


बुलेट ट्रेन कार्यान्वित झाल्यानंतर स्थानक परिसरात प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यानुसार आता बुलेट ट्रेन स्थानक परिसराच्या एकात्मिक विकासासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर बीकेसी आणि पालघर स्थानक परिसराचाही ठाणे – विरार स्थानकांच्या धर्तीवर विकास करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली.


ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक परिसराचा विकास कसा साधायचा हे ठरविण्यासाठी नुकतीच एमएमआरडीएच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील कार्यालयात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या आणि जायकाच्या अधिकाऱ्यांनी, तज्ज्ञांनी या कार्यशाळेस हजेरी लावली. यावेळी जायका आणि केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या मदतीने स्थानक परिसर विकासासाठी विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच हा आराखडा तयार करून स्थानक परिसराचा विकास मार्गी लावला जाणार आहे.

Comments
Add Comment

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच

श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हल्ला; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात संताप

कल्याण : काही दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या चाव्यानंतर भीतीतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त