Dombivali News : डोंबिवली - अखेर पी अँड टी कॉलनीतील पाणी प्रश्न मिटला

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेविका ऍड. कविता मिलिंद म्हात्रे यांनी त्यांच्या प्रभागातील पाणी प्रश्न उपस्थित केला होता. आपल्या प्रभागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून येथील पाणी प्रश्न सुटल्याचे नगरसेविका ऍड. म्हात्रे यांनी स्पष्ट केले. जनतेला दिलेला शब्द पुर्ण केला असून भाजपने करून दाखवलं अशी चर्चा होत आहे.


दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरता स्वतंत्र धरण असावे अशी मागणी नागरिकांनी केली असता भाजपा पदाधिकारी मिलिंद म्हात्रे यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण हे प्रयत्न करत असून नक्कीच स्वतंत्र धरण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.


पूर्वेकडील पी अँड टी कॉलिनी येथील काही इमारतींना अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील नगरसेविका ऍड. कविता म्हात्रे व भाजपा पदाधिकारी मिलींद म्हात्रे यांच्याकडे येथील राहिवाशांनी आपली हि समस्या मांडली.


पी अँड टी कॉलिनी येथे काही इमारतीत पाणी कमी दाबाने येत असल्याने रहिवाशी वैतागले होते. येथील रहिवाशांनी भाजपा नगरसेविका ऍड.कविता म्हात्रे यांना पाणी समस्येबाबत माहिती दिली. नागरिकांच्या या गांभीर समस्येवर भाजपा नगरसेविका ऍड. म्हात्रे यांनी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. येथे एकच पाणी लाईन असल्याची माहिती मिळताच नगरसेविका ऍड. कविता म्हात्रे व भाजपा पदाधिकारी मिलिंद म्हात्रे यांनी पालिकेच्या पाणी पूरवठा विभागाकडे मागणी करुन आणखी एक पाण्याची लाईन मंजूर करून घेतली.



पी अँड टी कॉलिनी प्रभाग पाणी टँकर मुक्त होणार !


कॉलनीत पाणी नाही म्हणून पाणी टँकर मागवित असल्याने त्यांच्या खिशाला भुर्दन्ड बसत होता. पाणी टँकर मुक्त प्रभाग हे स्वप्न यामुळे पुर्ण झाले असे महिला सांगत आहेत.

Comments
Add Comment

किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे.

AMCA stealth fighter : संरक्षण क्षेत्रात क्रांती! भारताच्या पहिल्या स्टेल्थ फायटर 'AMCA' साठी १५,००० कोटींची शर्यत सुरू; ३ बड्या कंपन्या शॉर्टलिस्ट!

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेची ताकद अनेक पटींनी वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) आज एक ऐतिहासिक पाऊल

Minister Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय विभागाने आर्थिक काटकसर करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : मत्स्यव्यवसाय विभागाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि आर्थिक शिस्त यांना सर्वोच्च प्राधान्य

मुंबईसह महत्त्वाच्या शहरांत मिळणार गरमागरम ‘मत्स्य पाव’- मंत्री नितेश राणे

 मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; रोजगारनिर्मितीसाठी राबवणार मोबाईल फूड व्हॅन योजना मुंबई : राज्यातील

Ashok Kharat : अशोक खरातची 'या' तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

Ashok Kharat : माहाराष्ट्राला हादरवणाऱ्या भोंदू अशोक खरातची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. आर्थिक

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार