Niranjan Davkhare : मुंबई-ठाणेकरांचा मेट्रो प्रवास लवकरच सुसाट! 'मेट्रो-४' प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने उद्घाटनाचे सरकारचे नियोजन

मुंबई : मुंबई आणि ठाणे या जोडशहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणाऱ्या 'मेट्रो-४' (ग्रीन लाईन) प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या प्रकल्पाचा पहिला टप्पा एप्रिल २०२६ पर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे राज्य सरकारने विधानपरिषदेत स्पष्ट केले. आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर झालेल्या चर्चेत भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी मेट्रो कामातील विलंब आणि वाढत्या खर्चाबाबत प्रशासनाला प्रश्न विचारला.


चर्चेदरम्यान प्रवीण दरेकर यांनी प्रकल्पातील त्रुटींकडे लक्ष वेधले. "मेट्रो-४ प्रकल्पाची मूळ मुदत जुलै २०२१ होती, जी आता ऑगस्ट २०२६ पर्यंत पुढे गेली आहे. या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च १२७४ कोटी रुपयांनी वाढला आहे. तसेच, मुलुंड आणि घाटकोपर येथील दुर्घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे," असे दरेकर यांनी नमूद केले. कांजूरमार्ग कारशेडच्या जागी मोगरपाडा (ठाणे) येथे कारशेड हलवल्याने कामाच्या गतीवर झालेला परिणाम लक्षात घेता, हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होईल, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.


यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मेट्रो-४ च्या टप्प्याटप्प्याने पूर्ण होणाऱ्या कामाचे सविस्तर नियोजन सभागृहासमोर ठेवले. त्यांनी सांगितले की, "मेट्रो-४ प्रकल्पाचा फेज-१ एप्रिल २०२६ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर फेज-२ डिसेंबर २०२६ पर्यंत आणि अंतिम फेज-३ नोव्हेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे." तांत्रिक अडचणी आणि कारशेडचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता कामाला वेग आला असून, मुंबईकर आणि ठाणेकरांना लवकरच या आधुनिक वाहतूक सेवेचा लाभ मिळेल, असे सकारात्मक उत्तर सरकारने दिले आहे.

Comments
Add Comment

अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित मुलींना मोठा दिलासा

लातूर : राज्य सरकारने सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता राज्य सरकारी

सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली उघड; कर्मचारीच....

मुंबई : प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात चोरीची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

राज्यातील हॉटेल, ढाबे,उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी महत्वाची अपडेट

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील

अचानक मोबाईलचं नेटवर्क गायब झाल्यास 'या' गोष्टी करा

सध्याच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आजच्या काळात एकमेकांशी संपर्क

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं.