मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच अपघातांची शक्यता लक्षात घेऊन महापौर डिंपल मेहता यांनी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध उपाययोजना करण्याच्या सूचना देत वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.


शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापौर डिंपल मेहता यांनी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची महापौर दालनात बैठक बोलावून रस्त्यावर अनधिकृत पार्किंग, वार्डन, शाळेतील पार्किंग, सिग्नल यंत्रणा, रिक्षा स्टॅन्ड याबाबत सविस्तर चर्चा केली आणि या समस्येतून मार्ग काढण्यासाठी काही सूचना दिल्या. त्यात प्रामुख्याने दुपारी आणि संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळेत वाहतूक कर्मचारी तैनात करणे, शहरातील प्रमुख चौकात बंद असलेले सिग्नल लवकर चालू करणे अशा सूचना देण्यात आल्या तसेच अनधिकृत रिक्षा स्टॅन्डची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. महापालिका इमारतीच्या बाजूला कोंबडी गल्ली येथे अनधिकृतरीत्या उभ्या राहणाऱ्या बस, चारचाकी वाहनांवर चौकशी करून कारवाई करणे, पी. के. रोड येथे दोन शाळा व आरोग्य केंद्र जवळ वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी. सुभाष चंद्र बोस मैदानालगत अनधिकृतरीत्या पार्किंग होणाऱ्या खासगी बस व ट्रक याची चौकशी करून कारवाई करणे, मीरा रोड येथील लतीफ पार्क व स्टार बाजार परिसरात असलेल्या पालिकेच्या वाहनतळाबाबत जनजागृती करणे अशा सूचना महापौर डिंपल मेहता यांनी दिल्या. यावर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी सर्व सूचना आणि निर्देश याचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे.

Comments
Add Comment

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हल्ला; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात संताप

कल्याण : काही दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या चाव्यानंतर भीतीतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त