मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच अपघातांची शक्यता लक्षात घेऊन महापौर डिंपल मेहता यांनी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध उपाययोजना करण्याच्या सूचना देत वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.


शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापौर डिंपल मेहता यांनी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची महापौर दालनात बैठक बोलावून रस्त्यावर अनधिकृत पार्किंग, वार्डन, शाळेतील पार्किंग, सिग्नल यंत्रणा, रिक्षा स्टॅन्ड याबाबत सविस्तर चर्चा केली आणि या समस्येतून मार्ग काढण्यासाठी काही सूचना दिल्या. त्यात प्रामुख्याने दुपारी आणि संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळेत वाहतूक कर्मचारी तैनात करणे, शहरातील प्रमुख चौकात बंद असलेले सिग्नल लवकर चालू करणे अशा सूचना देण्यात आल्या तसेच अनधिकृत रिक्षा स्टॅन्डची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. महापालिका इमारतीच्या बाजूला कोंबडी गल्ली येथे अनधिकृतरीत्या उभ्या राहणाऱ्या बस, चारचाकी वाहनांवर चौकशी करून कारवाई करणे, पी. के. रोड येथे दोन शाळा व आरोग्य केंद्र जवळ वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी. सुभाष चंद्र बोस मैदानालगत अनधिकृतरीत्या पार्किंग होणाऱ्या खासगी बस व ट्रक याची चौकशी करून कारवाई करणे, मीरा रोड येथील लतीफ पार्क व स्टार बाजार परिसरात असलेल्या पालिकेच्या वाहनतळाबाबत जनजागृती करणे अशा सूचना महापौर डिंपल मेहता यांनी दिल्या. यावर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी सर्व सूचना आणि निर्देश याचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे.

Comments
Add Comment

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी

बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे.

कडोंमपाचा ३ हजार १८६ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

कोणतीही कर आणि दरवाढ नाही राज्य सरकारच्या अनुदानावर मदार कल्याण : चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठाणे : डोंबिवली आणि ठाकुर्ली या दोन स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य

विकासकामांना वेग; डोंबिवलीत वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल; जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

मुंबई : डोंबिवली शहरातील काही भागात सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले

ठाण्यात पुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल; ३० एप्रिलपर्यंत काही मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

ठाणे : ठाणे शहराचा कायापालट केला जात आहे. त्यासाठी अनेक पुलांचे डागडुजीचे काम चालू आहे. त्यामुळे ठाणेकरांना