Chembur Accident : चेंबूरमध्ये भीषण अपघात; बांधकामाच्या ८व्या मजल्यावरून ६ कामगार खाली पडले

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष नगर भागात सुरू असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीवर काम करताना आठव्या मजल्यावरून सहा कामगार खाली कोसळल्याची दुर्घटना शनिवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.



सहाही कामगार गंभीर जखमी :


प्राथमिक माहितीनुसार, संबंधित इमारतीचे बांधकाम सुरू असताना हे कामगार ८व्या मजल्यावर काम करत होते. अचानक तोल गेल्याने ते खाली पडले. या अपघातात सहाही कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.



नियमांचे उल्लंघन केल्याने घडला अपघात :


माहितीनुसार, अपघाताच्या वेळी कामगारांनी आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर केलेला नव्हता. उंच इमारतींवर काम करताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट आणि इतर सुरक्षात्मक उपकरणे वापरणे बंधनकारक असते. मात्र या ठिकाणी नियमांचे पालन झाले नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. योग्य सुरक्षा साधने वापरली असती तर हा अपघात टाळता आला असता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.



तत्काळ मदतकार्य सुरू :


अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

Niranjan Davkhare : मुंबई-ठाणेकरांचा मेट्रो प्रवास लवकरच सुसाट! 'मेट्रो-४' प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने उद्घाटनाचे सरकारचे नियोजन

मुंबई : मुंबई आणि ठाणे या जोडशहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणाऱ्या 'मेट्रो-४' (ग्रीन लाईन) प्रकल्पाचे काम

Mumbai Traffic AI Management System : आता मुंबईच्या ट्राफ‍िक मॅनेजमेंटसाठी होणार AI ची मदत

- मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांची माहिती मुंबई : एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईच्या ट्राफ‍िक

Vijay Rashmika : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रश्मिका-विजयने दिली 'गुड न्यूज'; चाहत्यांना सुखद धक्का!

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकले

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन