मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर


केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या लाखो मजुरांची होळी आता आनंदात साजरी होणार आहे. यासाठी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.


प्राप्त झालेली रक्कम थोड्या दिवसांमध्ये थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील लाखो मजुरांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, आगामी होळी सण अधिक आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यास मदत होणार आहे.


मजुरांना आर्थिक अडचणी : गेल्या काही कालावधीत मनरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची मजुरी थकीत असल्यामुळे अनेक ग्रामीण कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर मंत्री गोगावले यांनी संबंधित केंद्रीय विभागाशी सातत्याने संवाद साधत निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश येत केंद्र शासनाने ११३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.


...............


राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबतच मजुरांच्या हक्काच्या मजुरीसाठी शासन कटिबद्ध आहे. भविष्यातही मनरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या प्रत्येक मजुराला वेळेवर मजुरी मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील राहील.
- भरत गोगावले, मंत्री, रोजगार हमी योजना

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र