शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर तुमच्यासाठी ही अत्यंत बातमी महत्त्वाची आहे. कायम धावपळीत असणाऱ्या आपल्या आयुष्यात बँकेची कामं आपण अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत ढकलतो.


जर तुमचं असं काही काम अडकलं असेल, तर आता उशीर करू नका. कारण उद्यापासून बँकांवर 'होळी' आणि 'विकेंड'चा असा काही रंग चढणार आहे की, सलग पाच दिवस बंद राहू शकतात.


होळीनिमित्ताने पुन्हा एकदा आरबीआयने सुट्ट्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. शनिवार आणि रविवार शेवटचा असल्याने दोन दिवस बँक बंद राहतील. २ मार्च होलिका दहन असल्याने काही ठराविक राज्यात बँका बंद राहतील.


३ मार्च धुलिवंदन आणि डोल जत्रा निमित्त मुंबई, दिल्ली, कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांत बँकांचे कामकाज होणार नाही. ४ मार्च होळीचा मुख्य सण असल्याने देशाच्या बहुतांश भागात बँकांना सुट्टी असेल.होळीच्या सणामुळे घराघरात आनंदाचं वातावरण असणार आहे, सलग सुट्ट्यांमुळे एटीएममध्ये खडखडाट जाणवण्याची शक्यता आहे.


खिशात ऐनवेळी पैसे नसतील तर अडचणीत सापडू शकता. बँका बंद असल्या तरी ATM सेवा सुरू राहील, पण सलग सुट्ट्यांच्या काळात अनेकदा एटीएममधील कॅश संपण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शक्य असल्यास आजच आवश्यक तितके पैसे काढून ठेवा.


या कालावधीमध्ये यूपीआय (UPI) सेवा सुरळीत सुरू राहतील. त्यामुळे पैसे पाठवण्याचे व्यवहार तुम्ही करू शकता. फक्त चेक क्लिअरन्स किंवा बँकेत प्रत्यक्ष जाऊन करायची कामं असतील, तर मात्र तुम्हाला ४ मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल. प्रत्येक शहरात स्थानिक सणानुसार सुट्ट्यांमध्ये बदल असू शकतो. त्यामुळे आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन किती दिवस आणि कशी सुट्टी असणार याची माहिती करून घ्या.

Comments
Add Comment

Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट, काय म्हणाले?

मुंबई: आज 'मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट लिहित मराठीजनांना,

मुंबई महापालिकेची सर्व परिपत्रके मराठीतूनच काढा; भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रविण छेडा यांची सभागृहात मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेचे कामकाज हे शंभर टक्के मराठीतून असतानाही आजही कामगारां विषयांच्या तसेच इतर बाबींची

महापालिका सभागृहात गुंजणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’; महापालिका सभागृहात एकमताने ठराव मंजूर

मुंबई: महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत असलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची धून आता

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

मुंबईत २७,२८ फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा

मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच पीएम विश्वकर्मा

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील