SBL Energy Blast : कंपनीचे मालक अजूनही ‘आऊट ऑफ रिच’

महिनाभरात तब्बल २६ कामगारांचा तडफडून मृत्यू


नागपूर : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत २६ कामगारांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १५ जण घटनास्थळी आणि ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या घटनेला एक महिना उलटून देखील कंपनीचे मालक संजय चौधरी आणि आलोक चौधरी यांचा ठाव ठिकाणी कळलेला नाही. तर कळमेश्वर पोलिसांना चौधरींवर गुन्हा दाखल करण्यापलिकडे अद्याप काहीच ठोस कारवाई करता आलेली नाही.


नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या राहुळगांव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड १ मार्च २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमाराला भीषण स्फोट झाला. एसबीएल एनर्जी लिमिटेड ही कंपनी खाणी, खनन आणि औद्योगिक वापरासाठी विविध प्रकारची विस्फोटके तयार करते. स्लरी एक्सप्लोसिव्ह्ज, इमल्शन एक्सप्लोसिव्ह्ज, बुल्क विस्फोटके, डेटोनेटर, डेटोनेटिंग फ्युज आणि कम कॉलम चार्ज विस्फोटके आदी उत्पादनात कंपनी कार्यरत आहे.


उपलब्ध माहितीनुसार, सदर कंपनी महाराष्ट्रात नोंदणीकृत असून तिचे मुख्यालय नागपूर शहरात आहे. कंपनीचा नोंदणी क्रमांक U24292MH2002PLC134851 असा आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक तथा मुख्य अधिकृत व्यक्ती म्हणून आलोक चौधरी यांचे नाव नोंद आहे.कंपनीची स्थापना २००२ साली ‘अमिन एक्सप्लोसिव्हज प्रा. लि.’ या नावाने झाली होती. त्यानंतर २०१६ मध्ये चौधरी कुटुंबाने कंपनीचे अधिग्रहण करून तिचे नाव बदलल्याचे आर्थिक अहवालांमधून समोर आलेय.


बारूद व स्फोटक उत्पादक कारखान्यांना परवाने देणे, सुरक्षिततेचे निरीक्षण करणे आणि नियमांची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी “पेट्रोलियम अँड एक्स्प्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन” (पेसो) यांच्याकडे असून पेसोचे मुख्यालयही नागपूरमध्येच आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या विस्फोटक कारखान्यांमध्ये वारंवार होणारे स्फोट, जीवितहानी आणि जखमींची वाढती संख्या यामुळे पेसोच्या निरीक्षण प्रक्रियेवर आणि नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एसबीएल एनर्जी लिमिटेड मधील स्फोटानंतर घटनेच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात आली. परंतु, अद्याप प्रशासनाला कगदी घोडे नाचवण्यापलिकडे काहीच करता आले नसल्याची खंत स्थानिकांकडून व्यक्त केली जातेय.



एसबीएलचे मलक अजूनही परांगदाच


गेल्या १ मार्च रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर एसबीएल एनर्जी लिमिटेडचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. याप्रकरणी २१ जणांना आरोपी बनवण्यात आले असून ११ जणांना अटक करण्यात आली आहे. परंतु, कंपनीचे मालक संजय चौधरी आणि आलोक चौधरी दोघेही नॉट रिचेबल झालेत. या दुर्घटनेनंतर दोघेही देश सोडून पळल्याचीही शंका व्यक्त होत आहे. कारखान्यातील स्फोटाच्या दिवशी संजय चौधरी आणि आलोक चौधरी हे रविवारीच छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून नागपूरला निघाले होते. दोघेही सायंकाळपर्यंत पोचतील असा दावा ग्रामीण पोलिस करत होते. मात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच ते नॉट रिचेबल झाले असून अजूनही पोलिसांसाठी आऊट ऑफ रिच आहेत. त्यामुळे या दुर्घटनेत तडफडून प्राण गमावणाऱ्या २६ जणांना नेमका न्याय कधी आणि कसा मिळेल..? असा प्रश्न त्यांचा कुटुंबिय विचारत आहेत.

Comments
Add Comment

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य

Fake cotton seeds : खरीपच्या तोंडावर मोठा घोटाळा उघड ! जामनेरमध्ये बनावट कापूस बियाण्यांचा साठा जप्त

Fake cotton seeds : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे.

PM Suryaghar Yojana : सौर ऊर्जेत महाराष्ट्राची दमदार झेप ! पीएम सूर्यघर योजनेत ८ राष्ट्रीय पुरस्कार; जळगाव देशात टॉप-१० मध्ये

PM Suryaghar Yojana : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने (Maharashtra) देशभरात आपली वेगळी छाप उमटवली

Minister Pratap Sarnaik : एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांना 'नो एन्ट्री'; मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

- अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राज्यव्यापी धडक मोहीम मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या 'एसटी'