SBL Energy Blast : कंपनीचे मालक अजूनही ‘आऊट ऑफ रिच’

महिनाभरात तब्बल २६ कामगारांचा तडफडून मृत्यू


नागपूर : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत २६ कामगारांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १५ जण घटनास्थळी आणि ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या घटनेला एक महिना उलटून देखील कंपनीचे मालक संजय चौधरी आणि आलोक चौधरी यांचा ठाव ठिकाणी कळलेला नाही. तर कळमेश्वर पोलिसांना चौधरींवर गुन्हा दाखल करण्यापलिकडे अद्याप काहीच ठोस कारवाई करता आलेली नाही.


नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या राहुळगांव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड १ मार्च २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमाराला भीषण स्फोट झाला. एसबीएल एनर्जी लिमिटेड ही कंपनी खाणी, खनन आणि औद्योगिक वापरासाठी विविध प्रकारची विस्फोटके तयार करते. स्लरी एक्सप्लोसिव्ह्ज, इमल्शन एक्सप्लोसिव्ह्ज, बुल्क विस्फोटके, डेटोनेटर, डेटोनेटिंग फ्युज आणि कम कॉलम चार्ज विस्फोटके आदी उत्पादनात कंपनी कार्यरत आहे.


उपलब्ध माहितीनुसार, सदर कंपनी महाराष्ट्रात नोंदणीकृत असून तिचे मुख्यालय नागपूर शहरात आहे. कंपनीचा नोंदणी क्रमांक U24292MH2002PLC134851 असा आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक तथा मुख्य अधिकृत व्यक्ती म्हणून आलोक चौधरी यांचे नाव नोंद आहे.कंपनीची स्थापना २००२ साली ‘अमिन एक्सप्लोसिव्हज प्रा. लि.’ या नावाने झाली होती. त्यानंतर २०१६ मध्ये चौधरी कुटुंबाने कंपनीचे अधिग्रहण करून तिचे नाव बदलल्याचे आर्थिक अहवालांमधून समोर आलेय.


बारूद व स्फोटक उत्पादक कारखान्यांना परवाने देणे, सुरक्षिततेचे निरीक्षण करणे आणि नियमांची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी “पेट्रोलियम अँड एक्स्प्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन” (पेसो) यांच्याकडे असून पेसोचे मुख्यालयही नागपूरमध्येच आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या विस्फोटक कारखान्यांमध्ये वारंवार होणारे स्फोट, जीवितहानी आणि जखमींची वाढती संख्या यामुळे पेसोच्या निरीक्षण प्रक्रियेवर आणि नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एसबीएल एनर्जी लिमिटेड मधील स्फोटानंतर घटनेच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात आली. परंतु, अद्याप प्रशासनाला कगदी घोडे नाचवण्यापलिकडे काहीच करता आले नसल्याची खंत स्थानिकांकडून व्यक्त केली जातेय.



एसबीएलचे मलक अजूनही परांगदाच


गेल्या १ मार्च रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर एसबीएल एनर्जी लिमिटेडचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. याप्रकरणी २१ जणांना आरोपी बनवण्यात आले असून ११ जणांना अटक करण्यात आली आहे. परंतु, कंपनीचे मालक संजय चौधरी आणि आलोक चौधरी दोघेही नॉट रिचेबल झालेत. या दुर्घटनेनंतर दोघेही देश सोडून पळल्याचीही शंका व्यक्त होत आहे. कारखान्यातील स्फोटाच्या दिवशी संजय चौधरी आणि आलोक चौधरी हे रविवारीच छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून नागपूरला निघाले होते. दोघेही सायंकाळपर्यंत पोचतील असा दावा ग्रामीण पोलिस करत होते. मात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच ते नॉट रिचेबल झाले असून अजूनही पोलिसांसाठी आऊट ऑफ रिच आहेत. त्यामुळे या दुर्घटनेत तडफडून प्राण गमावणाऱ्या २६ जणांना नेमका न्याय कधी आणि कसा मिळेल..? असा प्रश्न त्यांचा कुटुंबिय विचारत आहेत.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त