मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, मराठी भाषेला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर तिचे संवर्धन करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे," असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना त्यांनी भाषेच्या संवर्धनासोबतच सध्या सुरू असलेल्या राजकीय वादावरही आपली भूमिका स्पष्ट केली.



भाषेवरून होणारी टीका-टिप्पणी थांबवा


सामंत यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सांगितले की, 'सामना'तून होणाऱ्या टीकेमुळे आम्ही मराठीचा अपमान करतोय असा अर्थ काढणे चुकीचे आहे. भाषेच्या संरक्षणासाठी सकारात्मक चर्चा होणे गरजेचे आहे. जर आपल्याला मराठी भाषेला खऱ्या अर्थाने संरक्षण द्यायचे असेल, तर भाषेबाबतची अनावश्यक टीका-टिप्पणी थांबवावी लागेल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.



VSR कंपनीबाबत स्पष्टीकरण


विमान/हेलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या VSR कंपनीवरून होत असलेल्या आरोपांवरही उदय सामंत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, "त्या कंपनीबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती किंवा अधिकृत आरोप समोर आलेले नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा प्रवास अत्यंत सुरक्षित आणि निर्धोक व्हावा, हाच आमचा प्राथमिक उद्देश आहे आणि त्याच दृष्टीने काही तांत्रिक मुद्दे मांडण्यात आले आहेत."

Comments
Add Comment

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष